Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सर्जिकल स्ट्राइक्सचे श्रेय मोदींनाच जास्त

Webdunia
नवी मुंबई- भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्सचे श्रेय हे सर्व भारतीयांचे असल्याचे मत केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केले.
 
यांमध्ये या सर्जिकल स्ट्राइक्सविषयी शंका घेतलेल्यांचाही समावेश असल्याचे संरक्षणमंर्त्यांनी सांगितले. हे सर्जिकल स्ट्राइक्स एखाद्या राजकीय पक्षाने केले नसून भारतीय लष्कराने केले असल्याने याचे श्रेय सर्वच भारतीयांचे असल्याचे पर्रिकर म्हणाले. मात्र याचवेळी, या हल्ल्याचा निर्णय व आखणी करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण भूमिका बजाविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरकारला या श्रेयाचा मोठा वाटा द्यावयास हवा, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.
 
सर्जिकल स्ट्राइक्ससंदर्भातील जनतेच्या भावनांची जाणीव असल्याचे स्पष्ट करत र्पीकर यांनी आता जनतेचे समाधान झाल्याची भावना व्यक्त केली. सर्जिकल स्ट्राइक्ससंदर्भात काही राजकीय पक्षांनी शंका उपस्थित करत पुराव्याची मागणी केली आहे; तर काही राजकीय नेत्यांनी भारतीय जनता पक्षाकडून या घटनेचे राजकीय भांडवल केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पाश्र्वभूमीवर संरक्षणमंर्त्यांची ही भूमिका महत्त्वपूर्ण व संवेदनशील मानली जात आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Sarvapitri Amavasya 2024: सर्वपित्री अमावस्या बद्दल 10 न ऐकलेल्या गोष्टी जाणून घ्या

शारदीय नवरात्रीचे व्रत करण्यापूर्वी नियम जाणून घ्या

गजलक्ष्मी व्रत कथा वाचा, घरात लक्ष्मी नांदेल, सुख-संपत्ती, पुत्र-पोत्रादी आणि कुटुंब सुखी राहील

पितृ दोष म्हणजे काय ? निवारण उपाय जाणून घ्या

Shardiya Navratri 2024 : 3 की 4 ऑक्टोबर, शारदीय नवरात्र कधी सुरू होत आहे, घटस्थापनेची शुभ वेळ जाणून घ्या

पुढील लेख
Show comments