Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जिओ फोन आता भारतात फीचर फोन बाजाराचा प्रमुख

Webdunia
नवी दिल्ली- 30 टक्के मार्केट भागीदारीसह, रिलायंस जिओफोन 2019 च्या पहिल्या तिमाहीत भारतात अग्रगण्य वैशिष्ट्य फोन ब्रँड बनला. हे तथ्य शुक्रवारी काउंटरपॉइंट रिसर्चने आपल्या रिपोर्टमध्ये जारी केले आहे. 
 
काउंटरपॉइंटच्या ‘इंडिया स्मार्टफोन मार्केट शेअर क्वार्टर1 वर्ष 2019’ रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे की स्मार्टफोन बाजार विस्तृत संधी देतं, परंतू भारतीय बाजारात 400 मिलियन फीचर फोन वापरकर्त्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. 
 
सॅमसंग फीचर फोन श्रेणीत 15 टक्के भागीदारीसह दुसर्‍या क्रमांकावर आहे तसेच घरगुती हँडसेट निर्माता लावाने 13 टक्के बाजार भागीदारीसह तिसरं स्थान पटकावले आहे. 
रिपोर्टप्रमाणे 2018 मध्ये पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्टेड स्मार्टफोन मार्केट विपरीत, फीचर फोन मार्केट वेगाने वाढत आहे. यापूर्वी मार्चमध्ये, काउंटरपॉइंट रिसर्चची रिपोर्टमध्ये अंदाज व्यक्त केला गेला होता की 2019 मध्ये वैश्विक पातळीवर 400 मिलियनहून अधिक फीचर फोनची विक्री होईल. 
 
या व्यतिरिक्त, फीचर फोन शिपमेंट 2021 पर्यंत एक बिलियन युनिट पार करण्याची आशा आहे. 
ब्रोकरेज फर्म सीएलएसएने फेब्रुवारी 2019 साठी टेलिकॉम सेक्टरच्या दृष्टिकोनाने सांगितले की जिओ चालू वर्षामध्ये सब्सक्राइबर बाजार भागीदारीचे नेतृत्व करेल. 
 
आपल्या इंडिया टेलिकॉम रिपोर्टमध्ये, सीएलएसएने म्हटले की फेब्रुवारीत मोबाइल ग्राहकांची संख्या 2 मिलियन वाढून 1,184 मिलियन झाली, ज्यात रिलायंस जिओत 80 लाख नवीन ग्राहक जुळले. जिओकडे सध्या देशात 30.6 कोटी ग्राहक आधार आहे. जिओ ग्राहक आधार सतत वाढत आहे.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments