Marathi Biodata Maker

पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायत सदस्यांमधूनच सरपंचाची निवड

Webdunia
आता सरपंचाची निवड ही पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायत सदस्यांमधूनच होणार आहे. राज्य मंत्रिमंडळच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील सरकारने आणलेल्या योजनांचा पुनर्विचार करुन ज्या योग्य असतील त्याच पुढे सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, जनतेतून थेट सरपंच निवडीच्या निर्णयामध्ये बदल करण्यात आला आहे. दरम्यान, सरपंच हा जनतेतूनच निवडला जावा अशी मागणी ‘महाराष्ट्र राज्य सरपंच संघटने’ने केली आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाला या संघटनेने विरोध दर्शवला आहे.
 
दरम्यान, मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्यणाबरोबरच इतरही काही निर्णय घेण्यात आले. यामध्ये पुण्यात अध्यापकांसाठी कंपनी कायद्यानुसार प्रशिक्षण संस्था स्थापण करणे, पीएचडीधारक अधिव्याख्यात्यांना १९९६पासून दोन वेतनवाढ देणे त्याचबरोबर रसायन तंत्रज्ञान संस्था, तंत्रशास्त्र विद्यापीठातील शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाची सुधारित वेतनश्रेणी देण्याबाबत निर्णय घेण्यात आले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

World Energy Conservation Day: जागतिक ऊर्जा संवर्धन दिन का साजरा केला जातो, त्याचा इतिहास, महत्त्व आणि उद्देश जाणून घ्या

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका धर्मशाळेत आमनेसामने येतील

ईव्हीएम सुरक्षेवरून वाद निर्माण; स्ट्राँग रूम परिसरात जॅमर बसवण्याच्या मागणीसाठी उमेदवारांचे उपोषण

महायुती विरुद्ध लोकशाही! संजय राऊत यांचा विरोधी पक्षनेत्यावर हल्ला बोल

मनरेगाचे नाव बदलण्यावरून काँग्रेसची टीका अयोग्य: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढील लेख
Show comments