suvichar

नववीत शिकणाऱ्या मुलाचा 'या' कारणातून कोयत्याने केला खून

Webdunia
गुरूवार, 21 मार्च 2024 (08:11 IST)
दोन अल्पवयीन मुलांनी एका नववीत शिकणाऱ्या मुलाचा कोयत्याने खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संशयित दोन अल्पवयीन आरोपींना पुणे पोलिसांनी काही तासांत अटक केली आहे. दरम्यान १५ वर्षांच्या मुलांनाही कोयता सहज मिळत असल्याबद्दल पुणेकरांमध्ये चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
 
पुणे शहरातील सिंहगड परिसरात आनंदवन सोसायटी आहे. या खानापूर येथील महात्मा गांधी विद्यालयात नववीत शिकणारा या सोसायटीमध्ये प्रकाश हरिसिंग राजपूत (वय १५) परिवारासह सोसायटीच्या कामगारांचा खोलीत राहतो. सोमवारी शाळेतून आल्यावर जेवण करुन तो झोपला. तो झोपेत असताना दोन अल्पवयीन मुलांनी त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. तो घरातून पळत सुटला. मात्र काही अंतरावर तो कोसळला.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत प्रकाश आणि हल्लेखोर यांची एक मैत्रीण होती. हल्ला करणाऱ्यांपैकी एका मुलाशी ती मुलगी काही दिवसांपासून बोलत नव्हती. प्रकाशच्या सांगण्यावरुन ती मुलगी बोलत नाही, असा त्यांचा समज झाला. यामुळे त्यांनी प्रकाश यालाच संपवल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.
 
पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून अल्पवयीन मुलांकडून हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार सुरू आहेत. तसेच अनेक ठिकाणी वाहनांचे तोडफोडीच्या प्रकरणात सुद्धा मोठी वाढ होत असल्याने पोलीस आयुक्त यांनी याबाबत आता कठोर पावले उचलली आहेत.
 
Edited by Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

राज्य कर्मचाऱ्यांना दिलासा: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची (DA) थकबाकी मे महिन्याच्या पगारासोबत मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला

नवी मुंबई विमानतळाला 'दि. बा. पाटील' यांचे नाव देण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली; "नाव देण्याचा अधिकार न्यायालयाला नाही," असे कोर्टाने स्पष्ट केले

पेट्रोल वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय घेतला; मंत्री आता ऑनलाइन मंत्रिमंडळ बैठका घेणार

आई की वैरीण! आठ महिन्यांच्या चिमुकलीला पाजले ॲसिड, प्रकृती गंभीर

शेतकरी कर्जमाफी योजना आचारसंहितेमुळे रखडली, बळीराजा'मध्ये व्यापक असंतोष निर्माण

पुढील लेख
Show comments