Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आधी फेसबुकवरून प्रेमात ओढले, शारीरिक संबंधाची केली मागणी, बदनामीची धमकी दिली पुढे ........

Webdunia
सोमवार, 28 डिसेंबर 2020 (08:51 IST)
पुणे जिल्ह्यातील आळंदीत विवाहित महिलेने वीस वर्षीय तरुणाला फेसबुकच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर  माझ्या सोबत शारीरिक संबंधत ठेव असे म्हणून पैशांची मागणी करून पैसे न दिल्यास बदनामी करण्याची धमकी दिली. या सर्व प्रकरणाला कंटाळून आणि बदनामी होण्याच्या भीतीने तरुणाने आत्महत्या केली असून याप्रकरणी विवाहित महिले विरोधात तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
या घटनेत, आत्महत्या करणारा तरुण हा एसवायबीकॉम या वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका विवाहित महिलेने त्याला फेसबुकच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढले, त्यांच्यात फेसबुक मेसेंजरद्वारे अश्लील चॅट झाले. हे सर्व प्रकरण अवघे पंधरा दिवस चालले. परंतु, माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव असे म्हणून वीस वर्षीय तरुणाकडून विवाहित महिलेने पैश्यांची मागणी केली. पैसे न दिल्यास फेसबुकवरील मेसेज नातेवाईक आणि इतरांना पाठवण्याची धमकी तरुणाला देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. मात्र, या सर्व प्रकरणाला तरुण कंटाळला होता. तो मानसिक तणावात गेला. अखेर तरुणाने आत्महत्या केली. 
 
दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने बहिणीला फोन लावून प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. संबंधित महिला फसवत असून पैसे मागत असल्याचं देखील बहिणीला सांगितलं. त्यानंतर मात्र तरुणाने फोन बंद करून तरुणाने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख