suvichar

अर्ध्या रात्री डाव साधला; येरवडा तुरुंगातून पाच कैदी फरार

Webdunia
गुरूवार, 16 जुलै 2020 (12:16 IST)
पुण्यातील येरवडा तुरुंगातून बुधवारी मध्यरात्री पाच कैदी फरार झाल्यानं खळबळ उडाली आहे. देवगण चव्हाण, अक्षय चव्हाण, गणेश चव्हाण, अजिंक्य कांबळे आणि सनी पिंटो अशी पळालेल्या कैद्यांची नावे आहेत.
 
तुरुंग प्रशासनानं याबाबत माहिती दिली आहे. कारागृहाच्या इमारत क्रमांक चारच्या पहिल्या मजल्यावरील पाचव्या खोलीत हे पाच जण होते. रात्रीच्या सुमारास खोलीच्या खिडकीचे गज उचकटून व तोडून टाकून ते पळून गेले. हा प्रकार घडला तेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुयश जोशी व नितिन शिंदे हे त्यावेळी रात्रपाळीच्या ड्युटीवर होते. पळून गेलेल्यांपैकी तिघे दौंड तालुक्यातील रहिवासी असून एक हवेली तालुक्याचा तर एक पुणे शहरातील राहणारा आहे. त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणानुसार दौंड, लोणी-काळभोर व वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

नाशिक टीसीएस प्रकरण: २५ दिवसांपासून फरार असलेल्या निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथे पोलिसांनी अटक केली

अशोक खरात प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, भोंदू बाबाची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रात पुढील आठवड्यात १४ ते २० मे दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा

LIVE: महाराष्ट्रात सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट, गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला

LIVE: महाराष्ट्रात MSRTC चे NCMC स्मार्ट कार्ड सुरू झाले

पुढील लेख
Show comments