suvichar

प्रशासनामध्ये 2022 पासून केवळ इलेक्ट्रिक गाड्याच - आदित्य ठाकरे

Webdunia
गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (13:48 IST)
राज्यात एप्रिल 2022 पासून प्रशासनामध्ये केवळ इलेक्ट्रिक गाड्याच वापरण्यात येतील, अशी माहिती राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ते पुण्यात बोलत होते.
 
विभागीय आयुक्त कार्यालयात कार्बन न्यूट्रल आणि 'माझी वसुंधरा' या अभियानाबाबत आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
 
राज्यात प्लास्टिक बंदी झाल्यानंतर पुण्याने चांगलं काम केलं आहे. आता कार्बन न्यूट्रल शहरासाठी देखील पुण्याने पुढाकार घ्यायला हवा, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.
 
पुणे विभाग आणि जिल्ह्यात 'माझी वसुंधरा' अभियानात चांगलं काम झाल्याचंही ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
 
पुण्याच्या एक दिवसाच्या दौऱ्यात त्यांनी पिंपरी मधील टाटा मोटर्स कंपनीला भेट देऊन इलेक्ट्रिक कार निर्मिती प्रक्रियेची माहिती घेतली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

उपचारासाठी जालना येथून आलेल्या महिलेचे सिडको बस स्थानकावरून ऑटो चालकाने अपहरण केले

छत्रपती संभाजीनगर शहरात १०० नवीन ई-बस सुरू करण्यात येणार

LIVE: वाशिमचे माजी शिवसेना जिल्हाध्यक्ष सुरेश मापारी यांचा भाजपमध्ये प्रवेश

दिल्ली उच्च न्यायालयाने विनेशच्या बाजूने निकाल दिला, निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्यास परवानगी दिली

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना न्यायालयाकडून धक्का, प्रशांत अंबी धमकी प्रकरणात चौकशीचे आदेश

पुढील लेख
Show comments