Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बदलापूरच्या प्रकरणाची सरकारने गांभीर्याने नोंद घेत संवेदनशील भूमिका घ्यावी- शरद पवार

Webdunia
शनिवार, 24 ऑगस्ट 2024 (17:56 IST)
बदलापुरात दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. महाविकास आघाडीने या प्रकरणाच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद पुकारले होते. मात्र बंद ला उच्च न्यायालयाने परवानगी दिली नाही. 

बदलापूरच्या प्रकरणाच्या निषेधात विरोधी पक्षाने ठीक ठिकाणी मूक आंदोलन केले असून पुण्यात भरपावसात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवारांनी मूक आंदोलन केले आहे. हे आंदोलन पुण्यातील रेल्वे स्थानकाच्या परिसरात केले आहे. या वेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले, एक हादरवून टाकणारा मनाला अस्वस्थ करणारा प्रसंग बदलापुरात घडला आहे. या निमित्ताने आपण एकत्र आलो आहोत. बदलापुरातील चिमुकलींवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्राचे नाव धुमिल झाले आहे.

महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी आजच्या राज्यकर्त्यांवर आहे. त्याची जण आजच्या राजकर्त्यांनी नाही. अलीकडेच बदलापुरातच नव्हे तर देशातील आणखी काही थाईकानी देखील महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडल्या आहे. हे दुर्देव आहे. 

सरकारने या स्थितीचे गांभार्य पाहता संवेदनशील भूमिका सरकारने घ्यावी असे माझे मत आहे. राज्याचे काही लोक म्हणतात की, या प्रकरणात विरोधक राजकारण आणत आहे. महिलांवर मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात कोणी आवाज उठवला की त्याला राजकारण करत असल्याचे म्हणायचे. या वरून राज्य सरकार किती संवेदनशील आहे.हे दिसून येते.राज्य सरकारने यावर लक्ष द्यावे असं म्हणत त्यांनी महायुती सरकारच्या कारभारावर घणाघात टीका केली. 
 Edited By - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

भंडारा: गणेश विसर्जन मिरवणुकीत छत कोसळले, 30 हून अधिक महिला जखमी

7 रुपयांत इंटरनेट आणि कॉलिंगचा लाभ, या टेलिकॉम कंपनीने दिली जबरदस्त ऑफर

तिरुपती येथील लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर, मुख्यमंत्री नायडूंचा खळबळजनक आरोप

अंधेरी लोखंडवाला कॉंम्प्लेक्स मध्ये भीषण आग

'एक देश, एक निवडणूक'वर राज ठाकरेंचा टोला, म्हणाले- महाराष्ट्रात पहिली महापालिका निवडणूक झाली पाहिजे

पुढील लेख
Show comments