Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यातील पाणी कपात तूर्तास टळली, 15 मेनंतर निर्णय होणार

Webdunia
बुधवार, 26 एप्रिल 2023 (21:25 IST)
पुणेकरांच्या डोक्यावर असलेली पाणी कपातीची तलवार तूर्तास तरी टळली आहे. पुणे ग्रामीण आणि पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणात जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीपुरवठा शिल्लक आहे. त्यामुळे  याबाबत 15 मेनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत संपूर्ण आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
पुणे शहरात पाणी कपात करायची की नाही, यासाठी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती.  पुणे शहराला आणि ग्रामीण भागात जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा सध्या जिल्ह्यातील चार धरणांमध्ये शिल्लक आहे. खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या चारही धरणात एकूण 11.52 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणी कपात करावी लागण्याची शक्यता होती, असे मुद्दे या बैठकीमध्ये चर्चिले गेले. त्यानंतर पुण्यात 15 मेपर्यंत तरी पाणी कपात करायची नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सध्या तरी पुणेकरांना यांमुळे दिलासा मिळाला आहे.
 
पुणे शहराला ज्या धरणांतून पाणीपुरवठा करण्यात येतो, त्या वरसगाव, टेमघर, पानशेत आणि खडकवासला ही चारही धरणं मिळून एकूण 11. 52 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. खडकवासला धरणामध्ये 1.07 टीएमसी, पानशेत धरणामध्ये 3.41 टीएमसी, वरसगाव धरणामध्ये 6.75 टीएमसी, टेमघर धरणामध्ये 0.28 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी कालवा समितीची बैठक बोलवली होती. 
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Sarvapitri Amavasya 2024: सर्वपित्री अमावस्या बद्दल 10 न ऐकलेल्या गोष्टी जाणून घ्या

शारदीय नवरात्रीचे व्रत करण्यापूर्वी नियम जाणून घ्या

गजलक्ष्मी व्रत कथा वाचा, घरात लक्ष्मी नांदेल, सुख-संपत्ती, पुत्र-पोत्रादी आणि कुटुंब सुखी राहील

पितृ दोष म्हणजे काय ? निवारण उपाय जाणून घ्या

Shardiya Navratri 2024 : 3 की 4 ऑक्टोबर, शारदीय नवरात्र कधी सुरू होत आहे, घटस्थापनेची शुभ वेळ जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुंबईत मुसळधार पावसात नाल्यात पडून महिलेचा मृत्यू, BMC विरोधात FIR दाखल

Badlapur Encounter बदलापूर एन्काउंटरवर काय म्हणाले रामदास आठवले ?

तिचे 59 तुकडे करून पळाला, पकडल्या जाण्याच्या भीतीने आत्महत्या केली

नवीन जागतिक व्यवस्थेला आकार देत आहे भारत - ईशा अंबानी

मानहानी प्रकरणात संजय राऊत दोषी, 15 दिवसांची शिक्षा

पुढील लेख
Show comments