Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गोदावरीच्‍या पुराचा मराठवाड्यालाही फटका

गोदावरीच्या पुराचा मराठवाड्यालाही फटका
महेश जोशी
WD
नाशिकसह परिसरात सुरू असलेल्‍या जोरदार पर्जन्‍यवृष्‍टीमुळे गोदावरी नदीला पूर आला असून त्‍यामुळे पैठणचे जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण पूर्ण भरल्‍याने धरणातून दीड लाख क्‍युसेक्‍स पाणी सोडण्‍यात आले आहे. नदीच्‍या काठावर असलेल्‍या गावांना सतर्कतेचा इशारा देण्‍यात आला असून अनेक ठिकाणच्‍या ग्रामस्‍थांना सुरक्षित स्‍थळी हलविण्‍याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.

जायकवाडी धरणाने 18 सप्‍टेंबरची धोक्‍याची पातळी ओलांडल्‍याने विभागीय आयुक्‍तांनी धरणाचे 18 दरवाजे उघडण्‍याचे आदेश दिले असून काल धरणातून 18 हजार 300 क्‍युसेक्‍स विसर्ग संततधार पावसामुळे वाढून आता दीड लाखापर्यंत गेला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्‍यास उद्या 2 लाख क्‍युसेक्‍स पाणी सोडण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे काठावरील गावांनी सतर्क रहावे असा इशारा विभागीय आयुक्‍त दिलीप बंड यांनी दिला आहे.

काठावरील गावांतील लोकांना सुरक्षित स्‍थळी हलविण्‍याचे काम सुरू असून त्‍यांची व्‍यवस्‍था तात्‍पुरता परिसरातील शाळांमध्‍ये करण्‍यात आली आहे. सुमारे 218 गावांना या पुराचा फटका बसला आहे.

या पुराचे पाणी औरंगाबाद, परभणी, बीडसह नांदेडमध्‍येही येत्‍या 48 तासांत पोचण्‍याची शक्‍यता आहे.
( वरील छायाचित्र- अरूण तळेकर)

नाशिकमध्‍ये गोदावरीला महापूर
सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

कुणाल कामराच्या अडचणी वाढल्या, खार पोलिसांनी समन्स बजावले; या दिवशी उपस्थित राहावे लागेल

LIVE: 'सौगत-ए-मोदी' नाहीये हे सत्ता जिहाद आहे उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

'त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या, त्याला प्रसाद द्यायला हवा', कुणाल कामराच्या नवीन व्हिडिओवर मंत्री शंभूराज संतापले

मांजरीला घाबरून पळाली उकळत्या दुधाच्या भांड्यात पडली, चिमुरडीचा वेदनादायक मृत्यू

संविधान कोणीही बदलू शकत नाही... महात्मा गांधींचा उल्लेख केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी 'राम राज्य'वर काय म्हटले?

Show comments