Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बेजबाबदार वर्तन करणार्‍या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवणार का?

Webdunia
शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2016 (10:18 IST)
राज्यात मुठभर लोक कायदा व सुव्यवस्था बिघडवत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले वक्तव्य अतार्किक असून खरंतर राज्य सरकारच्या मंत्र्यांकडूनच राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, हेमराज शाह, क्लाईड क्रास्टो व संजय तटकरे उपस्थित होते.
 
सरकारमधील एक मंत्री खोट्या केसेस दाखल करण्याची धमकी देतात तर दुसरे मंत्री जाहीर सभेत शिव्या देतात. तसेच नाशिकमध्ये बिघडलेल्या परिस्थितीलाही तेथील पालकमंत्री गिरीष महाजनच जबाबदार आहेत. मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवणार काय? असे आव्हान मलिक यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांना दिले.
 
तसेच दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी वापरलेल्या शिवराळ भाषेचे भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, आमदार राम कदम हे समर्थन करत असल्याबद्दल मलिक यांनी त्यांच्यावर यावेळी कडाडून टीका केली.

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

एक्सप्रेस वेवर भाविकांनी भरलेल्या चालत्या बसला आग, आठ जण जिवंत जळाले

World AIDS Vaccine Day 2024:विश्व एड्स वैक्सीन दिवस आज,इतिहास, महत्व जाणून घ्या

International Museum Day 2024: आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन का साजरा करतात ,इतिहास आणि महत्व जाणून घ्या

IPL 2024: अभिषेक शर्मा IPL 2024 मध्ये चौकारांपेक्षा जास्त षटकार मारणारा फलंदाज

Russia Ukraine Crisis:पुतिन म्हणाले – खार्किव ताब्यात घेण्याची योजना नाही

पुढील लेख
Show comments