rashifal-2026

केएमटीच्या तोट्यातील 10 फेऱ्या बंद कुडीत्रे गावातील बस सेवा पूर्ण बंद

Webdunia
शुक्रवार, 31 मार्च 2023 (08:44 IST)
कोल्हापूर तोट्यातील 10 फेऱ्या शुक्रवारपासून बंद करण्याचा निर्णय केएमटी प्रशासनाने घेतला आहे. तसेच उद्या पासून कुडीत्रे गावातील बस सेवा पूर्ण बंद केली जाणार आहे. येथील सर्व तीन खेपा थांबविण्यात आल्या आहेत. हद्दवाढीसाठी शहरातील नागरिकांनी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. यामुळे हद्दवाढीतील गावांनाही हद्दवाढीला विरोध करण्यास सुरू केला.यामुळे आक्रमक झालेल्या हद्दवाढ कृती समितीने शहराबाहेर तोट्यातील केएमटीची सेवा बंद करा, अशी मागणी लावून धरली. यावर केएमटी प्रशासनाने 26 फेऱ्या पैकी कमी उत्पन्न मिळत असलेल्या 13 मार्गांचे सर्व्हेक्षण केले. यामध्ये ज्या खेपांना अत्यंत कमी प्रवासी असणाऱ्या 10 खेपा बंद करण्याचा प्रस्ताव केएमटी प्रशासनाने मनपा उपसमितीसमोर ठेवला. समितीच्या मंजूरीनंतर ही फाईल प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांचीकडे पाठविली होती. त्यांनीही तोट्यातील 10 फेऱ्या बंद करण्याच्या निर्णयास ग्रीन सिंग्नल दिला. त्यामुळे तोट्यातील 10 फेऱ्या आज, शुक्रवारपासून बंद होणार आहेत.
 
बस बंद होणारे मार्ग
 
सकाळी 6.15 वा.ची श्री शाहू मैदान ते मुडशिंगी
रात्री 9.25 वा.ची श्री शाहू मैदान ते कळंबा
सायं.7.55 वा.ची शिवाजी चौक ते कळंबा
रात्री 9.10 वा. ची आर.के.नगर राजारामपुरी, शाहू मैदान
 
कुडीत्रे गावातील प्रवाशांचे हाल
कुडीत्रे गावात दिवसांतून 3 खेपांद्वारे बस सेवा सुरू होती. हे तीन्ही खेपा तोट्यात होत्या. यामुळे उद्यापासून येथील सर्व फेऱ्या बंद करण्यात येणार आहेत. यामुळे कुडीत्रे गावातील बसने प्रवास करण्याऱ्यांचे हाल होणार आहे.
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

सरकारचा मोठा निर्णय मनरेगाचे नाव बदलून 'पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना' केले

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेअंतर्गत ₹165 कोटींचा घोटाळा, सरकारी कर्मचाऱ्यांकडून वसुली सुरू

वैभव सूर्यवंशीच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने 19 वर्षांखालील आशिया कपच्या पहिल्या सामन्यात युएईला हरवले

अर्शदीपने भारतीय गोलंदाज म्हणून 7 वाईडसह सर्वात लांब षटक टाकले

आशियातील सर्वात मोठे जीसीसी मुंबईत बांधले जाणार, ब्रुकफील्ड 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

पुढील लेख
Show comments