Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लूटमार करणारे ठाकरे सरकारचे ११ महाभाग; किरीट सोमैय्या यांनी जाहीर केली यादी

Webdunia
मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (08:18 IST)
गेल्या काही काळापासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजप यांच्यात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या ५ कंपन्यांवर सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) छापे टाकले आहेत. मुंबईहून वाशिमला पोहोचलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी गवळींच्या संस्थांवर धाडी टाकल्या.या कारवाईचे भाजपने स्वागत केले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडत,ठाकरे सरकारची महान इलेव्हन अशी यादीच दिली आहे.
 
भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी एक ट्विट करत ठाकरे सरकारची महान इलेव्हन असे लिहीत खाली ११ जणांची नावे लिहिली आहेत.यामध्ये प्रताप सरनाईक,अनिल देशमुख,अनिल परब,भावना गवळी,महापौर किशोरी पेडणेकर,रविंद्र वायकर,जितेंद्र आव्हाड,छगन भुजबळ,यशवंत जाधव,यामिनी जाधव,मिलिंद नार्वेकर यांची नावे लिहिण्यात आली आहेत.यानंतर ईडीने केलेल्या कारवाईचे स्वागत करत किरीट सोमैय्या यांनी समाधान व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची टीम लूटमार करतेय,असा आरोप किरीट सोमैय्या यांनी केला आहे.भावना गवळीच्या टीमने १०० कोटींची लूट नाही, तर माफियागिरी चालवली आहे. १८ कोटी रुपये रोख भावना गवळी यांनी विविध संस्थांमधून काढले आहेत आणि ७ कोटींची चोरी झाल्याचे असे प्रकार आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना फक्त एवढेच काम करत आहे.भावना गवळींच्या विविध संस्थांची चौकशी सुरु आहे.ईडीच्या या कारवाईचे स्वागत करत आहे,असे किरीट सोमैय्या यांनी म्हटले आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments