Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बारावीचे विद्यार्थी पेपरमध्ये गुंग असतांना बाहेर चोरट्यांनी डाव साधला! ११ मोबाईल लंपास

Webdunia
गुरूवार, 23 फेब्रुवारी 2023 (09:16 IST)
नाशिक : सध्या विद्यार्थी बारावीच्या परीक्षेच्या टेन्शन मध्ये असताना त्यांचे टेन्शन आणखी वाढवणारी घटना घडली आहे. वर्गात इंग्रजीचा पहिलाच पेपर सुरू असताना अज्ञात व्यक्तीने बाहेरून विद्यार्थ्यांचे ११ मोबाईल लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना नाशिकरोड परिसरातील के. जी महेता हायस्कूल, बिटको कॉलेज, जयराम भाई हायस्कुल येथे घडली आहे. विद्यार्थी पेपरमध्ये गुंग असताना बाहेर हा प्रकार घडला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत अधिकची माहिती अशी की, सध्या राज्यभरात बारावीची परीक्षा सुरू असून विद्यार्थी आधीच त्या व्यापात आहेत. काल मंगळवारी विद्यार्थ्यांचा इंग्रजीचा पहिलाच पेपर झाला. मात्र पेपर झाल्यानंतर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इंग्रजीचा पेपर सकाळी 11 वाजता होता. बिटको महाविद्यालय, के. जी. मेहता हायस्कूल, जयरामभाई स्कूल येथे पेपर देण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कॉपी विरहित परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयाकडून त्यांच्या बॅग वर्गात नेण्यास परवानगी नव्हती.
 
त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी त्यांचे मोबाईल बॅगमध्ये ठेवून ती बॅग दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. तर काही विद्यार्थ्यांनी वह्या पुस्तके व मोबाईल असलेली बॅग शाळा, महाविद्यालयाच्या बाहेर ठेवली होती. दुपारी दोन वाजता पेपर सुटल्यानंतर विद्यार्थी बॅगा व दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली बॅग घेण्यासाठी गेले. त्यावेळी काही विद्यार्थ्यांचे ११ मोबाईल चोरीस गेल्याचे लक्षात आले.
 
यानंतर विद्यार्थांनी थेट पोलीस ठाणे गाठले, या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बारावीला परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेला येताना सोबत मोबाईल आणू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

कोरोना महामारीदरम्यान मृत्यू झालेल्या 5 कोरोना योद्ध्यांना दिल्ली सरकार प्रत्येकी 1 कोटी रुपये देणार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले

दिल्लीहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये प्रवाशांच्या जेवणात आढळले झुरळ

मुंबई सिनेट निवडणुकामध्ये शिवसेनाने यश मिळवला, ही तर विजयाची सुरुवात -आदित्य ठाकरे

अरविंद केजरीवाल लवकरच मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार

पुढील लेख
Show comments