Festival Posters

अजून १४ ते १५ आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात : जयंत पाटील

Webdunia
राज्यात आता राष्ट्रपती राजवट लागू झाली असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मेरिटवर आमदारांची भरती होईल, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. भाजपा आणि अपक्ष मिळून १४ ते १५ आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.
 
संपर्कात असलेल्या या आमदारांना योग्यवेळी पक्षात घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. शिवाय ही भरती मेगाभरती नसून मेरिटवर भरती असणार असल्याचं जयंत पाटील म्हणाले. भाजपात गेलेले अनेक नेते राष्ट्रवादीत परतण्यास इच्छुक आहेत, पण स्थानिक नेत्यांशी बोलूनच भाजपात गेलेल्या नेत्यांना परत घेण्याबाबत विचार करणार असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रवादीच्या संपर्कात असलेल्या आमदारांची नावं घेऊन त्यांना आता अडचणीत आणणार नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
 
ज्या भाजपाविरोधात लढलो त्या पक्षासोबत जाण्याला मर्यादा आहेत, असं सूचक विधानही जयंत पाटील यांनी केलं. राष्ट्रवादीच्या बैठकीला आले असताना पाटील यांनी भाजपासोबत जाण्याची शक्यता पूर्णतः फेटाळली नाही. शिवसेनेसोबत जाण्यासंदर्भात 'दगडापेक्षा वीट मऊ' अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. राज्यात सरकार देण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही. शरद पवारच याबाबत निर्णय घेतील, असंही पाटील म्हणालेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

आगामी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा युतीचा फॉर्म्युला तयार, नवी मुंबईवरील गतिरोध, या भागात मैत्रीपूर्ण लढती

गोवा क्लब घटनेनंतर फरार झालेल्या लुथरा बंधूंना थायलंडमध्ये अटक; २५ जणांच्या मृत्यूप्रकरणी भारतात प्रत्यार्पण करणार

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकन नागरिकत्वासाठी १ दशलक्ष 'गोल्ड कार्ड' व्हिसा जारी केले, जाणून घ्या त्याचे फायदे काय असतील

इलेक्ट्रिक वाहनांकडून टोल वसुली 'बेकायदेशीर' आहे, सभापती राहुल नार्वेकर यांनी दिला ८ दिवसांचा अल्टिमेटम

LIVE: सभापती राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांची मागणी फेटाळली

पुढील लेख
Show comments