Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लातूर भूकंपाची 29 वर्षे: लातूरमध्ये भूकंपात हजारो लोकांचे प्राण गेले

Webdunia
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (12:01 IST)
30 सप्टेंबर 1993 रोजी महाराष्ट्रातील लातूर येथे मोठा भूकंप झाला तेव्हा हजारो लोक मृत्युमुखी झाले 30 सप्टेंबर 1993 रोजी पहाटे 3.56 वाजता महाराष्ट्रातील मराठवाडा भाग भूकंपाने हादरला होता. एक दिवस आधी अनंत चतुर्दशी होती. गणपती विसर्जन करून लोक थकून झोपले की त्यांना उठायला वेळच मिळाला नाही. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील 52 गावांमध्ये 10,000 लोक मारले गेले. हजारो जखमी झाले.

सर्व काही उद्ध्वस्त झाले. लातूरमध्ये पहाटे भूकंप झाला, त्यावेळी लोक गाढ झोपेत होते. त्यामुळे जीवित व मालमत्तेचे अधिक नुकसान झाले. भूकंपाचा केंद्रबिंदू किल्लारी येथे असल्याचे मानले जाते. 
 
लातूरच्या औसा भाग आणि उस्मानाबादचा उमरगा या भागांत सर्वाधिक फटका बसला. या भूकंपात 52 गावे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. रिश्टर स्केलवर 6.4 रिश्टर स्केलच्या या भूकंपात सुमारे 20 हजार लोक मृत्युमुखी झाले.या भूकंपात सुमारे 30 हजार लोक जखमी झाले, 30 हजार घरे कोसळली आणि 13 जिल्ह्यांतील सुमारे 2 लाख 11 हजार घरांचे नुकसान झाले. मदत आणि बचाव कार्यादरम्यान लष्कर आणि बचाव पथकाने अनेकांना ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढले. या नैसर्गिक आपत्तीत अपंगांना 46.55 लाख रुपयांची मदत देण्यात आली. रेडक्रॉस संस्थेने भूकंपग्रस्त भागात प्रत्येकी 27 खाटांची तीन ग्रामीण रुग्णालये तातडीने  बांधली.भूकंपात ज्यांची जनावरे मरण पावली त्यांना सरकारतर्फे जनावरे देण्यात आली. 

सरकारने जागतिक बँक आणि इतर देणगीदारांच्या मदतीने पीडितांसाठी एक मोठा पुनर्वसन कार्यक्रम राबवला. पुनर्वसनाच्या कामासाठी769 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. जागतिक बँक, आशियाई विकास बँक आणि अनेक देशी-विदेशी देणगीदार संस्थांनी मदत आणि बचाव कार्यासाठी देणगी दिली. 

Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

RSS चा तिसरा शैक्षणिक वर्ग नागपुरात सुरु होणार

सुनील छेत्रीने इंटरनॅशनल फुटबॉल मधून घेतला संन्यास, 6 जूनला खेळतील शेवटची मॅच

28 आठवड्यांच्या गर्भालाही जगण्याचा अधिकार, गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Bomb Threat च्या फ्लाइटमध्ये बॉम्बची अफवा, टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर मेसेज

मुंबई मध्ये 'स्पेशल 26' सारखे कांड, क्राईम ब्रांच सांगून कॅफे मालकाचे घर लुटले

कारमधून मिळाले दोन मृतदेह, मुंबई होर्डिंग अपघात 16 जणांचा मृत्यू

नागपूर मध्ये फ्लाईओपर वरून उडी घेतली महिलेने

पीएम नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाले काँग्रेस अल्पसंख्यांकांना देऊ इच्छित आहे 15 प्रतिशत बजेट

मुलगा आणि मुलीच्या प्रेमापोटी संपुष्टात आली शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची पार्टी- अमित शाह

मध्यप्रदेशात भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू, एक गंभीर

पुढील लेख
Show comments