Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चौरागढ महादेव दर्शनासाठी निघालेल्या 3 भाविकांचा कार अपघातात मृत्यू , एक जखमी

Webdunia
सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (14:52 IST)
मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे झालेल्या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला. रामपूर-सारणी रस्त्यावर दमुआजवळ हा अपघात झाला. झिरीघाटाजवळील सुरक्षा भिंतीला तरुणांची कार धडकली. अपघात एवढा भीषण होता की कारचा अक्षरश: चुरडा झाला.
 
नागपूरच्या वर्धा जिल्ह्यातील चार तरुण  चौरागढ महादेव मेळ्याला भेट देण्यासाठी जात होते . सोमवारी सकाळी 4 ते 6 च्या दरम्यान हे लोक दमुआ येथून रामपूर तांसी रस्त्यावरून निघाले. येथे दमुआच्या सात किमी पुढे शंकर मंदिराजवळील वळणावर बांधलेल्या सुरक्षा भिंतीला कार धडकली. या अपघातात तुषार नयनेश्वर झामडे (24) किणी आष्टी जिल्हा वर्धा, अक्षय प्रदीप धोखडे (26) तिवसा अमरावती आणि दीपक भावरावजी डाखोडे (25) आष्टी जिल्हा वर्धा या तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर चौथा तरुण अक्षय देविदास कुडापे (17)किणी आष्टी जिल्हा वर्धा हा गंभीररित्या जखमी झाला.
 
 कार वेगाने धावत होती. कार तुषार चालवत होता. वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याला काही समजले नाही आणि कार थेट सुरक्षा भिंतीवर जाऊन धडकली. अपघाताची माहिती मिळताच दमुआ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर मृतदेह बाहेर काढून शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आले आणि जखमी अक्षयला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दमुआ टीआय दीपक बावरिया यांनी सांगितले की, कार चालवताना तुषार हा दारूच्या नशेत होता, त्यामुळे हा अपघात झाला. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments