Marathi Biodata Maker

पालखीमध्ये कंटेनर घुसून ४ वारकरी ठार

Webdunia
सोमवार, 4 डिसेंबर 2023 (08:16 IST)
शिर्डीहून आळंदीला जाणा-या पालखीत कंटेनर घुसल्याने चिरडून चार वारक-यांचा मृत्यू झाला, तर ८ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी ब-याच जणांची प्रकृती गंभीर आहे. नाशिक-पुणे महामार्गावर ही घडली. पायी चालणा-या वारक-यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
शिर्डी येथील काशिकानंद महाराज यांची पायी दिंडी शिर्डीहून आळंदीकडे जात होती. या दिंडीत भरधाव वेगात येणारे एमएच १२ व्हिटी १४५५ कंटेनर घुसल्याने भीषण अपघात झाला आणि या अपघातात चार वारक-यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर आठ वारकरी गंभीर जखमी झाले आहेत.
 
अपघातानंतर घटनास्थळी युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू होते. आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून संतप्त नागरिकांनी या कंटेनरची तोडफोड केली. अपघातात वारकरी ठार झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातातील जखमी आणि मयतांची ओळख पटली असून त्यांची नावेदेखील समोर आली आहेत.
 
जखमींमध्ये बिजलाबाई शिरोळे (रा. वाळकी ता. राहता), राजेंद्र कारभारी सरोरे (रा. माळी ता. कोपरगाव), भाऊसाहेब दशरथ गायकवाड, ओंकार नवनाथ चव्हाण (रा. मढी सूर्य, ता. कोपरगाव), निवृत्ती पुंजा डोगरे (रा. पंचाळा, ता. सिन्नर), शरद सचिन चापके (रा. परभणी), अंकुश ज्ञानेश्वर कराळ (रा. अकोला), मिराबाई मारुती ढमाले (रा. वावी ता. सिन्नर) यांचा समावेश आहे.
 
मृतांची नावे
-बाळासाहेब अर्जुन गवळी (रा. मढी, ता. कोपरगाव)
-बबन पाटीलबा थोरे (चोपदार) (रा. द्वारकानगर, शिर्डी)
-भाऊसाहेब नाथा जपे (रा.कनकोरी, ता. राहता)
-ताराबाई गंगाधर गमे (रा.को-हाळे, ता. राहता)

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: सरकार ओबीसी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध

महाराष्ट्रात राज्यात ६.५ लाख कोटी रुपयांच्या अणुऊर्जा प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली

अर्थसंकल्प वाचवण्यासाठी बुलेट ट्रेन आणि द्रुतगती मार्गांचे प्रकल्प थांबवण्याची रोहित पवार यांची मागणी

१९ वर्षीय नवविवाहितेच्या आर्त विनवणीकडे दुर्लक्ष झाले; दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला, नागपूर मधील घटना

भंडारा : साकोली तहसील परिसरात आग विझवण्याचा प्रयत्न करताना शेतकऱ्याचा जळून मृत्यू

पुढील लेख
Show comments