rashifal-2026

पालखीमध्ये कंटेनर घुसून ४ वारकरी ठार

Webdunia
सोमवार, 4 डिसेंबर 2023 (08:16 IST)
शिर्डीहून आळंदीला जाणा-या पालखीत कंटेनर घुसल्याने चिरडून चार वारक-यांचा मृत्यू झाला, तर ८ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी ब-याच जणांची प्रकृती गंभीर आहे. नाशिक-पुणे महामार्गावर ही घडली. पायी चालणा-या वारक-यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
शिर्डी येथील काशिकानंद महाराज यांची पायी दिंडी शिर्डीहून आळंदीकडे जात होती. या दिंडीत भरधाव वेगात येणारे एमएच १२ व्हिटी १४५५ कंटेनर घुसल्याने भीषण अपघात झाला आणि या अपघातात चार वारक-यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर आठ वारकरी गंभीर जखमी झाले आहेत.
 
अपघातानंतर घटनास्थळी युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू होते. आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून संतप्त नागरिकांनी या कंटेनरची तोडफोड केली. अपघातात वारकरी ठार झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातातील जखमी आणि मयतांची ओळख पटली असून त्यांची नावेदेखील समोर आली आहेत.
 
जखमींमध्ये बिजलाबाई शिरोळे (रा. वाळकी ता. राहता), राजेंद्र कारभारी सरोरे (रा. माळी ता. कोपरगाव), भाऊसाहेब दशरथ गायकवाड, ओंकार नवनाथ चव्हाण (रा. मढी सूर्य, ता. कोपरगाव), निवृत्ती पुंजा डोगरे (रा. पंचाळा, ता. सिन्नर), शरद सचिन चापके (रा. परभणी), अंकुश ज्ञानेश्वर कराळ (रा. अकोला), मिराबाई मारुती ढमाले (रा. वावी ता. सिन्नर) यांचा समावेश आहे.
 
मृतांची नावे
-बाळासाहेब अर्जुन गवळी (रा. मढी, ता. कोपरगाव)
-बबन पाटीलबा थोरे (चोपदार) (रा. द्वारकानगर, शिर्डी)
-भाऊसाहेब नाथा जपे (रा.कनकोरी, ता. राहता)
-ताराबाई गंगाधर गमे (रा.को-हाळे, ता. राहता)

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

मोरया गोसावी संजीवन समाधी : मोरया गोसावी कोण होते?

वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्याला राज्य आपत्ती घोषित, कुटुंबांना देणार सरकारी नोकरी; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

LIVE: महाराष्ट्र सरकारने वाघ-बिबट्याच्या हल्ल्याला राज्य आपत्ती घोषित केले

नोटांच्या बंडलासोबतचा VIDEO व्हायरल

लपाछपी खेळताना बेपत्ता झालेला मुलगा पाच दिवसांनी पाण्याच्या टाकीत मृतावस्थेत आढळला

पुढील लेख
Show comments