Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

60 एकरातील ऊस जळून खाक, 20 शेतकऱ्यांचे नुकसान

Webdunia
सोमवार, 31 जानेवारी 2022 (10:32 IST)
अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्याचे खूप नुकसान झाले आहे. पावसामुळे पीक खराब झाला आहे. या मुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाना सामोरी जावे लागत आहे. राज्यात अजूनही काही ठिकाणी पाऊस कोसळत आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना पडला आहे. दुष्काळात तेरावा अशी म्हण चरितार्थ झाली आहे. लातुरात. लातूर तालुक्यात भिसे वाघोली शिवारा येथे शॉट सर्किटने लागलेल्या आगीमुळे 60 एकर ऊस जळून खाक झाला आहे. या आगीत 20 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. महावितरणच्या कारभारामुळे आणि त्यांच्या दुर्लक्षतेमुळे हे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. 
 
मांजरा आणि विकास सहकारी कारखान्याच्या हद्दीत उसाची लागवड केली जाते. या ठिकाणी गाळपाची सोय असल्याचा नगदी पिकाचा फायदा शेतकऱ्यांना होतो. 

भिसेवाघोलीत 60 एकरात ऊस लागवड केली आहे. हा ऊस तोडणीलाच आला होता. रविवारी दुपारी शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत हे ऊस जळाले आहे. शॉर्ट सर्किटच्या एका ठिणगीने पाहता-पाहता रौद्र रूप घेत 60 एकरातील उसाला जळून खाक केले. या उसावरच शेतकऱ्यांचे वार्षिक अर्थनियोजन असते. या भागात ऊसच मुख्य पीक आहे. आगीत झालेल्या नुकसानीमुळे 20 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या आगीत उसाचेच नाही तर इतर शेती साहित्याचे नुकसान देखील झाले आहे.  
 
आगीची माहिती मिळतातच विलास साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाने पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. तो पर्यंत आगीने उसाचे भक्षण केले होते. 

या घटनेची माहिती मिळतातच महसूल आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. शॉर्टसर्किट मुळे ही आग लागल्याचे नमूद केले आहे. या आगीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत केली जाईल असे आ.धीरज देशमुख यांनी सांगितले आहे.     
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments