Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दरड कोसळून अडीच महिने उलटल्यानंतर केंद्रीय पथक पाहणीसाठी येणार

A central team
Webdunia
सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (22:05 IST)
राज्यात पश्चिम महाराष्ट्र, रायगड आणि चिपळूणमध्ये अतिवृष्टीमुळे दरडी आणि पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. दरडी कोसळून अनेक जणांचा मृत्यू झाला होता. राज्यात दरड कोसळून अडीच महिने उलटल्यानंतर केंद्रीय पथकाला जाग आली आहे. केंद्रीय पथक पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर, रायगड आणि सांगली, चिपळूणमधील नुकसानीचे पाहणी करण्यासाठी आले आहे. उद्या केंद्रीय पथक तब्बल अडीच महिन्यानंतर महाराष्ट्रात येणार आहे.
 
राज्यातील घटनेला दोन ते अडीच महिने झाले आहेत. राज्यात अतिवृष्टी झाल्यामुळे दरड कोसळल्या आहेत. या सगळ्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पाहणी दौरा करत आहेत. केंद्रीय पथकाचा दौरा खेड, चिपळूणमधील पुरग्रस्त भागाची पाहणी, सांगलीमध्ये दुपारी केंद्रीय पथक दाखल होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेईल. मिरज तालुका आणि इतर भागातील नुकसानीचा आढावा घेण्यात येणार आहे. परंतु केंद्रीय पथकाच्या दौऱ्यावर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दोन ते अडीच महिन्यानंतर पथक येणार आहे तर पाहणी काय करणार असे अनेक प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

भाजप नेत्याने घरात गोळीबार केला, 3 मुलांचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

पुण्यात एका अभियंत्याने पत्नीवर विश्वासघातचा संशय घेऊन त्याच्या अल्पवयीन मुलाचा गळा चिरला

23 मार्च हा भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांचा शहीद दिवस

LIVE: शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीमुळे राजकीय खळबळ,संजय राऊत म्हणाले

शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीमुळे राजकीय खळबळ,संजय राऊत म्हणाले-

पुढील लेख
Show comments