rashifal-2026

दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना आधार कार्डची सक्ती

Webdunia
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल तर त्यांना परीक्षा देता येणार नाही, असे या निर्णयात म्हटले आहे.
 
या परीक्षांचे ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांना परीक्षा अर्जात आधार क्रमांक भरायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नाही त्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी आधार कार्ड सादर करायचे आहे. आधार कार्ड नसल्यास या वर्षी विद्यार्थ्यांना निकाल देणार नाही असेही मंडळाने स्पष्ट केले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना  ७ नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरता येतील. ७ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे.
 
ज्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड अद्याप काढले नाही अशा विद्यार्थ्यांनी येत्या चार महिन्यांत आधार कार्ड तातडीने काढावे अशा सूचना सर्व शाळांना मंडळाकडून देण्यात येणार आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मागणी

LIVE: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

मुकेश अंबानी म्हणाले की, एआय देशाचे भाग्य बदलेल - पुढील दोन-तीन दशकांत भारत 30 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनेल

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा वस्तुस्थिती असल्याचा प्रताप सरनाईक यांचा दावा

पुढील लेख
Show comments