Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तब्बल सोळा दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात पावसाची सर्वदूर हजेरी

Webdunia
शनिवार, 22 सप्टेंबर 2018 (15:20 IST)
पावसाच्या या खंडामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशी, तुर या पिके कोमेजली होती तर सोयाबीन पीक पिवळे पडण्यास सुरवात झाली होती यावेळी पावसाची नितांत गरज होती मात्र दुपारपासून मध्यम स्वरूपात बरसत असलेल्‍या पावसामुळे शेतक-यांच्‍या खरीप हंगामातील पिकांवरील संकट सावट दूर झाले. पिकांना नवसंजीवणी मिळाली आहे.
 
4 सप्टेंबर पासून पावसाने खंड दिल्‍याने पिकांनी माना टाकण्‍यास सुरवात केली  होती. अशात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झाले होते मात्र दुपारनंतर कुठे रिपरिप तर कुठे मध्यम स्वरूपाच्या स्वरूपात पावसाच्या सरी कोसळल्यने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाने जोर धरल्‍याने पिकांवर आलेल्‍या विविध किडींचा नायनाट होण्‍यासही या पावसाची मदत झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक पावसाची सरासरी 911.34 असून आत्‍तापर्यत जिल्‍हयात वार्षिक सरासरीच्‍या  674.79 मिलिमीटर पावसाची नोंद करण्‍यात आली आहे याची टक्केवारी 74.04 टक्‍के आहे.
 
पावसामुळे पुस प्रकल्‍पात 100 टक्‍के, अरूणावती 95 टक्‍के, बेंबळा प्रकल्‍प 62 टक्‍के, लोअर पूस 92 टक्के, सायखेडा 100, गोकी 91, वाघाडी 85 टक्के, बोरगाव 98 टक्के, अडाण 94 टक्के, नवरगाव 100 टक्के पावसाने प्रकल्‍प भरलेली आहे. तसेच मध्‍यम प्रक्‍ल्‍पात 70 टक्‍के तर 92 लघू प्रकल्‍पात 67 टक्‍के जलसाठा निर्माण झालेला आहे. असे एकूण जिल्‍हयातील 102 मोठे, मध्‍यम व लघू प्रकल्‍प 62 टक्‍के भरलेले आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments