Dharma Sangrah

अजितदादांना भावली टपरीवरची कॉफी...

Webdunia
सोमवार, 22 जानेवारी 2018 (15:29 IST)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा सातव्या दिवशी हिंगोली येथील सभेला हल्लाबोल यात्रा मार्गक्रमण करत असताना अजितदादांना कॉफीची तल्लफ आली आणि त्यांनी गाडी थांबवायला सांगितली. रस्त्यावर कुठेच चांगले हॉटेल नव्हते म्हणून चालक गाडी थांबवण्यासाठी थोडे शाशंक होते. मात्र अजितदादांनी कळमनुरी तालुक्यातील माळेगाव फाटा येथे एका टपरीवर गाडी थांबवून तिथेच कॉफी पिणे पसंत केले.

नेतेमंडळी गाडीने जाताना काचही खाली करत नाहीत. सामान्य माणूस जिथे वावरतो अशा ठिकाणी कार्यक्रमाव्यतिरीक्त शक्यतो जात नाहीत, असा गैरसमज लोकांना असतो. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे , विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे , विधिमंडळ पक्षनेते अजित पवार , किसान सेलचे राज्यप्रमुख शंकरअण्णा धोंडगे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ , आ. विक्रम काळे,यांनी हा समज मोडीत काढत टपरीवर लोकांमध्ये बसून लोकांशी मनमोकळा संवाद साधला. कॉफी बनवेपर्यंत अजितदादांनी चहावाल्याशी संवाद साधला. टपरीवरील स्पेशल भज्यांचाही त्यांनी आस्वाद घेतला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

LIVE: अशोक खरात घोटाळ्यात नाशिकमधील नामवंत डॉक्टर आणि सोनोग्राफी केंद्रे रडारवर

खळबळजनक! सप्तश्रृंगी गडावर मोठी चोरी; देवीच्या मंदिरातून २२ किलो चांदी लंपास!

लाडक्या बहिणींनो घाई करा! ३० एप्रिलपर्यंत e-KYC अपडेट न केल्यास 'लाडकी बहीण' योजनेचा १५०० रुपयांचा हप्ता रखडणार

संजय राऊतांचा मोठा दावा, ममता आणि स्टालिन पुन्हा सत्तेत येणार! ; शाहांना दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला

सुनेत्रा मुख्यमंत्री झाल्यास मला आनंदच होईल, बारामतीमध्ये मतदान केल्यानंतर सुप्रिया म्हणाल्या

पुढील लेख
Show comments