Dharma Sangrah

अजितदादांना भावली टपरीवरची कॉफी...

Webdunia
सोमवार, 22 जानेवारी 2018 (15:29 IST)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा सातव्या दिवशी हिंगोली येथील सभेला हल्लाबोल यात्रा मार्गक्रमण करत असताना अजितदादांना कॉफीची तल्लफ आली आणि त्यांनी गाडी थांबवायला सांगितली. रस्त्यावर कुठेच चांगले हॉटेल नव्हते म्हणून चालक गाडी थांबवण्यासाठी थोडे शाशंक होते. मात्र अजितदादांनी कळमनुरी तालुक्यातील माळेगाव फाटा येथे एका टपरीवर गाडी थांबवून तिथेच कॉफी पिणे पसंत केले.

नेतेमंडळी गाडीने जाताना काचही खाली करत नाहीत. सामान्य माणूस जिथे वावरतो अशा ठिकाणी कार्यक्रमाव्यतिरीक्त शक्यतो जात नाहीत, असा गैरसमज लोकांना असतो. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे , विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे , विधिमंडळ पक्षनेते अजित पवार , किसान सेलचे राज्यप्रमुख शंकरअण्णा धोंडगे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ , आ. विक्रम काळे,यांनी हा समज मोडीत काढत टपरीवर लोकांमध्ये बसून लोकांशी मनमोकळा संवाद साधला. कॉफी बनवेपर्यंत अजितदादांनी चहावाल्याशी संवाद साधला. टपरीवरील स्पेशल भज्यांचाही त्यांनी आस्वाद घेतला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात TMS 2.0 लाँच केले

'SIR 2' साठी भाजप महाराष्ट्राने केली विशेष तयारी, प्रतिनिधींची यादी जाहीर

मुंबई: धारावी येथे छाप्यात लाखो रुपयांची औषधे जप्त

LIVE: एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय हनुमंत जगदाळे यांची ठाणे महानगरपालिकेत सभागृह नेतेपदी नियुक्ती

नाशिकमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत होता

पुढील लेख
Show comments