Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अजित पवार यांनी पटोलेंचे 'ते' विधान फेटाळले

Webdunia
गुरूवार, 17 फेब्रुवारी 2022 (14:52 IST)
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 10 मार्चला मंत्रिमंडळात फेरबदल होतील, असं वक्तव्य केलं होतं. पटोले यांच्या वक्तव्याला आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी उत्तर दिलं आहे. असे कोणतेही बदल होणार नाही, याचा निर्णय हे तिन्ही पक्षाचे प्रमुख ठरवतील. असं म्हणत अजित पवार यांनी पटोलेंचे विधान फेटाळले आहे. त्यावेळी ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
 
अजित पवार म्हणाले की, ”हे सरकार शरद पवार , काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आणले आहे. सरकारमध्ये काही बदल करायचे आहे की नाही, हे तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन ठरवतील. हे ठरवतील तसे आम्ही काम करत आहोत. राज्याचे प्रमुख जे ठरवतील ते होईल,” असं म्हटल आहे. 
 
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, ”तिन्ही पक्षात मतांतर होणार नाही याची काळजी घेतली जाते. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा शिकवला. मतांची विचारधारा वेगळी असू शकते पण यापूर्वी अशी कटुता कधीच नव्हती. यापूर्वीही सरकार वेगवेगळी आली. महाराष्ट्राला न शोभणारी वक्तव्य केली जात आहेत, मत स्वातंत्र्य असले तरीही ही महाराष्ट्राची परंपरा नाही.”

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाला सलाम केला, बदलापूरमध्ये विकास योजना जाहीर केल्या

LIVE: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली

नेपाळी विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर ५ जणांना अटक

देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना दिला इशारा, बैठकीपूर्वी अजेंडा लीक झाल्याने मुख्यमंत्री संतापले

शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या स्थापनेवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- यात काहीही चुकीचे नाही

पुढील लेख
Show comments