Marathi Biodata Maker

अजित पवारांचा फक्त फुटीर गट

Webdunia
मंगळवार, 4 जुलै 2023 (07:47 IST)
मुंबई : अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. अजित पवार यांनी केलेल्या नियुक्त्या कायदेशीर आहेत का, असा सवाल केला. शरद पवार यांना तुम्ही अध्यक्ष मानता, मग त्यांनी घेतलेले निर्णय तुम्हाला मान्य आहेत का, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. तसेच अजित पवारांचा फक्त फुटीर गट आहे. त्यामुळे त्यांना फक्त इतर पक्षात विलीन होता येते, असे आव्हाड म्हणाले.
 
शरद पवार यांना अध्यक्ष मानता. मग सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर त्यांनी केलेली कारवाई मान्य करणार का, असा सवाल करीत आव्हाड यांनी शरद पवार अध्यक्ष आहेत. त्यांनी जयंत पाटील यांची नियुक्ती केली आहे, असे म्हटले.अजित पवारांनी केलेल्या नियुक्त्या कायदेशीर आहेत का? शरद पवार अध्यक्ष आहेत. मग यांनी केलेल्या नियुक्त्या घटनात्मक कशा, पक्षाची मान्यता नाही त्यांना नियुक्त्या करण्याचा अधिकार नाही. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना निलंबित केले आहे, त्यांना कोणतेच अधिकार नाहीत. अजित पवारांची पत्रकार परिषद किटी पार्टी होती, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.
 
त्यांनी वाटलेल्या पदांना संविधानिक मान्यता नाही
सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान विविध पदे वाटली. पण त्यांना संविधानिक मान्यता नाही. एकच राष्ट्रवादी पक्ष आहे, त्याचे अध्यक्ष शरद पवार आहेत. अध्यक्षांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना निलंबित केले आहे. त्यामुळे त्यांना कोणालाही नियुक्त करता येत नाही, असे आव्हाड म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

डॉ. बाबा आढाव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार राज्य शासनाचा निर्णय

मानसिक छळाला कंटाळून नागपूरमधील 29 वर्षीय कबड्डीपटू किरणची आत्महत्या

"शारीरिक संबंध ठेवल्यास मी पगार वाढवीन"; अधिकाऱ्याच्या त्रासला कंटाळून कंत्राटी नर्सने केले विष प्राशन

LIVE: महाराष्ट्र सरकारने वाघ-बिबट्याच्या हल्ल्याला राज्य आपत्ती घोषित केले

इंडिगो संकटावरून पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली

पुढील लेख
Show comments