Dharma Sangrah

सर्वांगीण विकास मोदींची गॅरंटी-पंतप्रधान नरेंद्र मोदी

Webdunia
शनिवार, 13 जानेवारी 2024 (09:40 IST)
शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन मी दहा वर्षांपूर्वी कार्य सुरू केले होते. त्यावेळी महाराजांच्या साक्षीनेच देश बदलणार असल्याचे सांगितले होते. देशातील जनतेने १० वर्षांत स्वप्नांना प्रत्यक्षात येताना पाहिले आहे. जिथे इतरांची गॅरंटी संपते, तिथे मोदीची गॅरंटी सुरू होते. याच मोदी गॅरंटीच्या माध्यमातून मी आज सांगत आहे की येत्या काही वर्षांत मी देशातील २ कोटी महिलांना लखपती दिदी बनविणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ज्यांनी आधी देशावर अनेक वर्ष राज्य केले, त्यांच्याकडे विकासाचे धोरण नव्हते. आधी हजारो कोटींच्या घोटाळयांचीच चर्चा व्हायची. पण आज हजारो कोटींच्या विकास प्रकल्पांची चर्चा होत असल्याचे मोदींनी सांगितले. तत्पूर्वी सकाळी नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतूच्या लोकार्पणासह विविध प्रकल्पांच्या शिलान्यास तसेच भूमीपूजन करण्यात आले. त्यानंतर नवी मुंबई येथे आयोजित जनसभेस त्यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी उपस्थित सर्वांना माझा नमस्कार असे म्हणत त्यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. आजचा दिवस मुंबई आणि महाराष्ट्रासोबतच विकसित भारतासाठी ऐतिहासिक आहे. आज जगातील सर्वात मोठया समुद्रीसेतूंपैकी एक अशा अटल सेतूचे लोकार्पण झाले आहे. देशाच्या विकासासाठी आपण समुद्राशीही टक्कर घेऊ शकतो, लाटांनाही तोंड देऊ शकतो हे आपण दाखवून दिले आहे.

Edited By -  Ratnadeep ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

हिंदी महासागरात एक जोरदार भूकंप झाला; रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ५.३ होती

LIVE: बेकायदेशीर बांगलादेशीवर कारवाई करण्यासाठी फडणवीस सरकारने निर्णय घेतला

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्ये एक नवीन वळण; उमेदवारांच्या मृत्यूमुळे तीन भागातील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या

बेकायदेशीर बांगलादेशींची घुसखोरी ही एक गंभीर समस्या बनली; फडणवीस सरकारने कारवाईचा मोठा निर्णय घेतला

महिला T20लीगचे वेळापत्रक जाहिर

पुढील लेख
Show comments