Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यातील सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालये 30-31 जुलै 2022 रोजी सुरू राहतील

Webdunia
बुधवार, 27 जुलै 2022 (08:44 IST)
नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत दंड माफी अभय योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत थकीत मुद्रांक शुल्क भरण्याचा पहिला टप्पा ३१ जुलै २०२२ पर्यंत संपणार असल्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले असून राज्यातील सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय शनिवार ३० जुलै व रविवार ३१ जुलै रोजी फक्त याच कामासाठी सुरू ठेवण्यात येणार असल्याचे नाशिकचे सह जिल्हा निबंधक वर्ग १, तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी कळविले आहे.
 
या संदर्भात जारी करण्यात आलेल्या शासकीय प्रसिध्दी पत्रकात नमूद केल्यानुसार, दंड माफी अभय योजनेअंतर्गत नागरिकांनी ३१ जुलै २०२२ पर्यंत सहभाग नोंदवल्यास थकलेल्या मुद्रांक शुल्काच्या दंडास साधारण ९० टक्के माफी शासनामार्फत देण्यात येणार आहे. तसेच १ ऑगस्ट २०२२ नंतर सहभाग नोंदविल्यास थकलेल्या मुद्रांक शुल्काच्या दंडास ५० टक्के माफी देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने ३१ जुलै २०२२ पर्यंत या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिकचे सह जिल्हा निबंधक वर्ग १, तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी केले आहे.
 
शनिवार ३० जुलै व रविवार ३१ जुलै २०२२ रोजी शासन जमा झालेली चलने त्याच दिवशी किंवा १ ऑगस्ट २०२२ पर्यंत स्वीकारण्यात येतील, असे निर्देश प्राप्त झाले असल्याची माहिती नाशिकचे सह जिल्हा निबंधक वर्ग १, तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी दिली आहे.

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments