Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवा वाद, अमोल कोल्हे नथुराम गोडसेची भूमिका साकारणार, अनेकांचा विरोध

Webdunia
गुरूवार, 20 जानेवारी 2022 (20:55 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार अमोल कोल्हे यांच्या व्हाय आय किल्ड गांधी या नथुराम गोडसेंच्या भूमिकेतील चित्रपटावरून नवा वाद निर्माण झाला आहे. खासदार अमोल कोल्हे या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारात असल्याने हा वाद निर्माण झाला आहे. अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी यावर विरोध दर्शवला आहे. अमोल कोल्हेंचा या चित्रपटाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. ३० जानेवारीला हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रोमो प्रदर्शित होताच होणाऱ्या विरोधावर आताा अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “हा महाराष्ट्र कीर्तनाने पूर्णपणे घडला नाही की तमाशाने पूर्णपणे बिघडला नाही” असे त्यांनी म्हटले आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी यासंदर्भात फेसबुकवर एक पोस्ट केली आहे.
 
अमोल कोल्हे यांनी पोस्टमध्ये लिहिले की, २०१७ साली केलेला “Why I killed Gandhi” हा सिनेमा Limelight या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असं समजलं आणि अनेकांनी विचारलं डाॅक्टर तुम्ही नथुराम गोडसे या भूमिकेत? उत्तरादाखल मला कुठेतरी वाचलेलं वाक्य आठवलं- “हा महाराष्ट्र कीर्तनानं पूर्णपणे घडला नाही आणि तमाशानं पूर्णपणे बिघडला नाही!” या वाक्यातील नकारात्मक सूर बाजूला ठेवला तर मला या वाक्यात एक सकारात्मक गोष्ट जाणवते ती म्हणजे “Reel लाईफ” आणि “Real लाईफ” यातील फरक स्पष्ट करणारी सीमारेषा अधोरेखित करणं.”असेही अमोल कोल्हे यांनी म्हटले.

संबंधित माहिती

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

पुढील लेख
Show comments