rashifal-2026

नरभक्षक बिबट्याचा हल्ला सहावा बळी

Webdunia
मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017 (16:21 IST)

जळगाव येथील चाळीसगाव तालुक्यात पाच जणांचा लागोपाठ बळी बिबट्याने घेतला आहे. आज मंगळवारी पहाटेत्याने पुन्हा हल्ला करत  सहावा बळी घेतला. बिबट्याला ठार मारण्याचे आदेश राज्याच्या वनमंत्र्यांनी दिले आहेत. चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे खुर्द येथे झोपडीत झोपलेल्या वृद्धेवर बिबट्याने हल्ला केला, यामुळे  बिबट्याच्या हल्यातील मयतांची संख्या सहावर पोहोचली आहे. मात्र वन प्रशासन सुस्त दिसत असून फिरण्या पलीकडे कोणतेही काम ते करताना दिसत नाहीत. 

या हल्ल्यात यमुनाबाई तिरमली (७०) महिला ठार झाली.  मंगळवारी पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास ही घटना समोर  आली.  वनविभागा वर ग्रामस्थ संतापले आहेत. यमुनाबाई तिरमली यांच्या झोपडीवजा घरात कुटुंबातील तीन मुलांसह झोपल्या होत्या. त्याचवेळी नरभक्षक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. घटनास्थळापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर तिरमली यांची मान आढळली तर धडाचा शोध घेण्याचे काम सुरू होते. राहुल चव्हाण (८), अलका अहिरे (५०), बाळू सोनवणे (२५), दीपाली नारायण जगताप (२५), सुसाबाई धना नाईक (५५)  या सर्वांवर बिबट्याने हल्ला करत ठार केले आहे. या परिसरात नागरिक फार भयभीत झाले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

Bank Holidays in February: फेब्रुवारी महिन्यांत बँका एकूण 9 दिवस बंद राहणार

बजेटच्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यांचा निवडणूक प्रचार स्थगित करण्याचा निर्णय

समृद्धी एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, ठाण्यातील आई व मुलाचा दुर्देवी मृत्यू

अर्थसंकल्पात आयटीआर भरण्याची अंतिम मुदत वाढवली, परदेशातील शिक्षण स्वस्त झाले

पुढील लेख
Show comments