Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अशोक चव्हाणांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा : मेटे

Webdunia
मंगळवार, 11 मे 2021 (08:03 IST)
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जाणूनबुजून दुर्लक्ष करणारे आणि सरकारला यामध्ये लक्ष घालून देणाऱ्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली.
 
सोमवारी नाशिकच्या दौऱ्यावर होते.  यावेळी  पत्रकारांशी बोलताना विनायक मेटे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने कोणत्याही स्वरूपाचे प्रयत्न केले नाही. त्यामुळेच मराठा समाज हा आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे. त्याला सर्वस्वी जबाबदार राज्य सरकार आहे. राज्य सरकारने योग्य ते वकील दिले नाही तसेच राज्य सरकारने योग्य ती कागदपत्रे ही पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे दिली नाही त्यामुळे हि केस कमकुवत झाली असे सांगून मेटे म्हणाले की या प्रकरणामध्ये काही प्रमाणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील जबाबदार असून त्यांनी त्याची जबाबदारी घ्यावी अशी मराठा समाजाची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
 
या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठा मध्ये मागील तीन न्यायाधीश आणि नवे दोन न्यायाधीश आल्यामुळे पाच न्यायाधीशां मध्येच मतभेद निर्माण झाले. त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून या निकालावर झाला असे ते म्हणाले. न्यायालयामध्ये देखील निकालावरून मतभिन्नता होती हे स्पष्ट होत आहे न्यायालयाच्या खंडपीठाने जो निकाल दिला आहे त्यामध्ये वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे देखील सांगून ते म्हणाले की आता केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

बेडरूममधील या 3 चुकांमळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे 10 सोपे उपाय करून पहा

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

LIVE: मालेगाव स्फोट प्रकरणाच्या सुनावणीचा निकाल देण्यापूर्वीच न्यायाधीशांची बदली

सोसायटीच्या लिफ्टमध्ये कुत्र्याला जाण्यापासून रोखले, मालकाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली

बीड मशिदीत स्फोट प्रकरणी दोन्ही आरोपींवर UAPA लागू

मालेगाव स्फोट प्रकरणाच्या सुनावणीचा निकाल देण्यापूर्वीच न्यायाधीशांची बदली

मुंबईत निरोप भाषणाच्या वेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

पुढील लेख
Show comments