suvichar

आरक्षण घटने प्रमाणेच द्या - अशोक चव्हाण

Webdunia
सोमवार, 5 मार्च 2018 (10:04 IST)

भारतीय राज्य घटनेने सूचित केल्याप्रमाणे सगळी आरक्षणं अबाधित राहिली पाहिजेत. आर्थिक निकषावर आरक्षण द्यायला हवं हे शरद पवार यांचं मत वैयक्तिक आहे असे प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी स्पष्ट केले. कार्यकर्ता मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शिवराज पाटील चाकूरकर, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील, आ. दिलीपराव देशमुख, तु आ. अमित देशमुख, आ. त्र्यंबक भिसे, आ. बसवराज पाटील मुरुमकर, ललितभाई शहा,  उपस्थित होते. 

निवडणुका जवळ आल्यानं सगळ्यांनीच तयारी सुरु केल्यानं राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीचा विषय निघालाच. राष्ट्रवादीशी आघाडी करावी की करु नये याबद्दल कार्यकर्त्यांचं मत काय आहे असा प्रश्न विचारला असता, वेगवेगळ्या ठिकाणची मते वेगवेगळी आहेत, काही ठिकाणी करा म्हणतात, काही ठिकाणी नको म्हणतात. शिबिरांच्या माध्यमातून आम्ही सर्वांची मते जाणून घेत आहोत, अद्याप यावर अजून काही नक्की झाले नाही. काही राज्यात भाजपला सत्ता मिळाली असं होत राहतं. राज्यात मोठ्या प्रमाणावर शाळा बंद केल्या जात आहेत, शालेय शिक्षणाबाबतचा त्यांचा विचार सकारात्मक दिसत नाही. इकडे शाळा बंद अन तिकडे मोठ्या प्रमाणावर दारुची दुकाने उघडली जात आहेत. शासनाची प्राथमिकता कशाला आहे? शाळा बंद करणे आणि दारुची दुकाने उघडणे असा प्रकार चालू आहे.  नुसत्याच घोषणा केल्या जातात असेही चव्हाण म्हणाले.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

सर्वोच्च' निर्णयावर ट्रम्प संतापले, सर्व देशांवर 10% जागतिक टॅरिफची घोषणा केली

एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये महाराष्ट्राकडून डिजिटल प्रशासनाचा एक नवा चेहरा सादर : मंत्री आशिष शेलार

मुस्लिम समुदायासाठी 5% आरक्षण रद्द ,महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान

LIVE: मुस्लिम समुदायासाठी 5% आरक्षण रद्द ,महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान

अमरावती ग्रामीणमध्ये रस्ते अपघातांना आळा, पोलिसांची 10ब्लॅक स्पॉट्सवर विशेष मोहीम सुरू

पुढील लेख
Show comments