Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जिह्यात सेवा समाप्तीचे 39 एसटी कर्मचारी कामावर परतले

Webdunia
शनिवार, 2 एप्रिल 2022 (15:14 IST)
रत्नागिरी जिह्यामध्ये संपामुळे सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आलेले 39 कर्मचारी पुन्हा एकदा कामावर हजर झाले आहेत़ या कर्मचाऱयांनी मागील काही दिवसात कामावर हजर होण्यासाठी अर्ज दाखल केला होत़ा त्यानुसार एसटीच्या रत्नागिरी विभागाकडून तातडीने अर्जाचा विचार करत कामावर हजर होण्यास मंजुरी दिल़ी आता कारवाई झालेले आणखी कर्मचारी कामावर हजर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े
 
  राज्य शासनाकडून 31 मार्चपर्यंत कामावर हजर होण्यासाठी आवाहन केले होत़े त्यानंतर कठोर कारवाई करण्यात येईल, असे संकेत राज्य शासनाकडून देण्यात आले होत़े आता 1 तारखेनंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे रत्नागिरी विभागाकडून सांगण्यात आले. आतापर्यंत एसटीच्या 185 कर्मचाऱयांना बडतर्फ करण्यात आले आह़े तर 237 जणांवर सेवा समाप्तीची कारवाई रत्नागिरी विभागाकडून करण्यात आली आह़े तर पुढील दिवसात आणखी काही कर्मचारी हे सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई सुरूच राहणार असल्याचे रत्नागिरी वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले.
 
 रत्नागिरी विभागात सुमारे 4 हजार एसटी कर्मचारी आहेत़ यापैकी 700 कर्मचारी कामावर हजर होत आहेत़ तर 187 कर्मचारी हे अधिकृत रजेवर आहेत. त्यानुसार उर्वरित कर्मचाऱयांवर कारवाईचे पाऊल विभागाकडून उचलण्यात आले आह़े कर्मचाऱयाना नोटीस देवून कायदेशीर बाबी तपासून बडतर्फी अथवा सेवा समाप्तीची कारवाई करण्यात येत असल्याचे रत्नागिरी विभागाकडून सांगण्यात आल़े 

संबंधित माहिती

Potato Price: बटाट्यामुळे बिघडणार घराचे बजेट, महाग होण्याची शक्यता

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यावर ईव्हीएमला हार घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल

263 कोटी टीडीएस घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने आणखी एक अटक केली

अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट,आप'चा भाजपवर मोठा आरोप

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार,हेड आणि नरेन यांच्यात रोमांचक लढत

Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनवर दोन क्षेपणास्त्रे डागली, 10 जणांचा मृत्यू

मान्सून 9 ते 16 जूनदरम्यान महाराष्ट्रात येण्याची शक्यता

नॅशनल आयकॉन सचिन तेंडुलकरने मुलगा अर्जुनसोबत बजावला मतदानाचा हक्क

Lok Sabha Election: आदित्य ठाकरेंचा मोठा दावा, म्हणाले- 'मतदान जाणूनबुजून कमी करवले जात आहे

Lok Sabha Election 2024: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दुपारी 1 वाजे पर्यंत 27.78 टक्के मतदान

पुढील लेख
Show comments