Festival Posters

राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा; ‘या’ भागात पावसाची शक्यता

Webdunia
मंगळवार, 4 एप्रिल 2023 (21:36 IST)
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कधी थंडी तर कधी उन्हाचा कडाका जाणवत आहे. अशातच आता हवामान विभागानं आता सात एप्रिलपर्यंत राज्यातील विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा यलो अलर्टचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दरम्यान, आज (4 एप्रिल) विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
 
विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सध्या उन्हाळा सुरु आहे मात्र, अशातच आता हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
 
आज विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उद्या (5 एप्रिल) गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर 6 एप्रिलला पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली आणि विदर्भातील अकोला जिल्ह्यातही हवामान विभागानं पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. तर 7 एप्रिलला देखील पश्तिम महाराष्ट्रसह मराठवाड्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
 
या काळात शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी. काळे ढग जमा झाले असताना किंवा वीजा चमकत असताना शेतकऱ्यांनी शेतात काम करु नये. शेतकऱ्यांनी अशा स्थितीत घराचा आश्रय घ्यावा. तसेच शेतकऱ्यांची शेतातील काही अर्धवट कामे राहिली असतील तर ती कामे देखील शेतकऱ्यांनी उरकून घ्यावीत.

Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: बेकायदेशीर बांगलादेशीवर कारवाई करण्यासाठी फडणवीस सरकारने निर्णय घेतला

बेकायदेशीर बांगलादेशींची घुसखोरी ही एक गंभीर समस्या बनली; फडणवीस सरकारने कारवाईचा मोठा निर्णय घेतला

महिला T20लीगचे वेळापत्रक जाहिर

वसई-विरारमध्ये ११ वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू

Train accident in China भीषण रेल्वे अपघातात अनेकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments