Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईला पाणी पुरवठा करणारे भातसा धरण ओव्हरफ्लो

Webdunia
शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (22:30 IST)
शहापुर तालुक्यातील मुंबईला पाणी पुरवठा करणारे भातसा धरण शनिवारी ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाचे दोन दरवाजे ०.२५ मीटर उघडण्यात आले असून १२४६.२६ क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापुर तालुक्यातील तानसा, मोडकसागर पाठोपाठ भातसा हे धरण देखील आता तुडुंब भरले आहे. शनिवारी ठिक दुपारी २.३० वाजता धरणाचे पाच पैकी धरण गेट क्रमांक १ आणि ५ हे दोन दरवाजे तातडीने उघडले असून भातसा नदी किनाऱ्या लगतच्या साजीवली, सरलांबे, तुते, सावरशेत, सापगाव, खुटघर, खुटाडी अशा अन्य गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे जलसंपदा विभागाच्या भातसा धरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी मााहिती देताना सांंगितले.
 
मुंबईला पाणी पुरवठा करण्याची महत्वाची जबाबदारी भातसा धरणावर आहे. प्रतिदिन २००० एमएलडी पाणी भातसा धरणातून मुंबई आणि ठाणे महानगराला दिले जाते. या धरणाची लांबी ९५९ मीटर असून तळपायापासून उंची ८९ मीटर आहे. तसेच एकूण जलसंचय ९७६.१० दशलक्षघन मीटर आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र ३८८.५० चौरस किलोमीटर आहे.
 
भातसा धरणाला जोडलेला उजवा तिर कालवा ६७ किलोमीटर आहे. तर डावा कालवा ५० किलोमीटर आहे. भातसा धरणाच्या पाण्यावरती जलविद्युत केंद्राद्वारे १५ मेगावॅट एवढी वीजनिर्मिती केली जाते. 

संबंधित माहिती

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

पुढील लेख
Show comments