Festival Posters

मोठी घोषणा, दहावी आणि बारावीच्या वेळापत्रकामध्ये बदल

Webdunia
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021 (09:03 IST)
राज्यात दहावी आणि बारावीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव आणि आरोग्यासंदर्भातील नियम लक्षात घेता सालाबादप्रमाणे यंदा नियोजित महिन्यामध्ये परीक्षा न घेता सरकारच्या संमतीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षांचे वेळापत्रक बदललं आहे. दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षा यंदा एप्रिल-मेमध्ये होणार आहेत. बारावीची परीक्षा २३ एप्रिल २०२१ ते २१ मे २०२१ दरम्यान होणार आहे. तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ दरम्यान होणार असल्याचं मंडळाने स्पष्ट केलं आहे. मुंबई, कोकण, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोल्हापूर या नऊ विभागांमध्ये या परीक्षा एकाचवेळी घेतल्या जाणार आहेत.
 
महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरही १६ फेब्रुवारी २०२१ पासून हे नवीन वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे, यासाठीही एप्रिल आणि मे महिन्यामधील लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रकाही जाहीर करण्यात आले आहे. कोरोनासंदर्भात केंद्र आणि राज्य शासनाबरोबरच आरोग्य विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करतच परीक्षा घेण्याची परवानगी देण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीय.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

पेरू तोडल्याबद्दल निवृत्त सैनिकाने मुलीला बांधून मारहाण केली

पुढील २४ तास धोक्याचे ! महाराष्ट्रात काही जिल्ह्यांना वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

LIVE: बारामती पोटनिवडणूक सुनेत्रा पवार आणि आकाश मोरे यांच्यात लढली जाईल

१६ व्या वर्षी विवाह, १७ व्या वर्षी मृत्यू... अल्पवयीन नववधूचा मृतदेह विहिरीत आढळला

पुणे: बास्केटबॉल रिंग तुटल्याने बी.टेक विद्यार्थ्याचा मृत्यू; निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे पोलिसांचे आश्वासन

पुढील लेख
Show comments