Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला मोठा दिलासा

Webdunia
बुधवार, 15 डिसेंबर 2021 (16:18 IST)
बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात दिलासा मिळाला आहे. आता आर्यनला  दर शुक्रवारी मुंबईतील एनसीबी कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी जावे लागणार नाही. जामिनाची ही अट रद्द करत मुंबई उच्च न्यायालयाने शाहरुख खानला हा दिलासा दिला आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जेव्हा एसआयटी समन्स पाठवेल तेव्हा त्याला दिल्लीत हजर राहावे लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. ही अट फेटाळण्यात यावी, अशी याचिका आर्यन खानच्या वतीने कोर्टात सादर करण्यात आली होती.
आर्यन खानला 3 ऑक्टोबरला एनसीबीने अटक केली होती, त्यानंतर या प्रकरणात बरीच कारवाई होताना दिसत होती. ही बातमी समजताच सुपरस्टार शाहरुख खान शूटिंग सोडून स्कॉटलंडहून भारतात आला आणि तेव्हापासून त्याची संपूर्ण कायदेशीर टीम आर्यनला जामीन मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत होती.
आर्यन खानला जामीन मिळाल्यावर त्यात अनेक अटी जोडण्यात आल्या होत्या, त्यापैकी ही एक अट होती. आर्यनला दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजर राहावे लागत होते, मात्र आता न्यायालयाच्या आदेशानंतर त्याला तसे करावे लागणार नाही. न्यायालयाच्या या आदेशामुळे त्याला दिलासा मिळाला आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आंदोलकांनी केनियाच्या संसदेला आग लावली,भारताने आपल्या नागरिकांसाठी एक ॲडव्हायजरी जारी केली

ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी, मोदी-राहुल गांधींनी सोबत जाऊन केलं अभिनंदन

अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक

इराणमध्ये नवीन राष्ट्राध्यक्षांच्या निवडीनंतर भारताबरोबरच्या संबंधांवर काय परिणाम होणार?

मुंबईतल्या कॉलेजमधील हिजाब बंदीच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार

सर्व पहा

नवीन

पुणे पोर्श कार अपघात आरोपीला जामीन मिळाल्यामुळे मृतक मुलीच्या आईला अश्रू अनावर

शिवराज यांच्या मार्गावर शिंदे सरकार, राज्यामध्ये होऊ शकते लाडली बहना सारख्या योजनेची सुरवात

रस्ते खराब असतील तर टोल टॅक्स घेणे चुकीचे, लोक तर भडकतीलच- नितिन गडकरी

ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड

लोकसभेमध्ये राहुल गांधींना मिळाली मोठी जवाबदारी, शरद पवार म्हणाले, 'भारत जोड़ो यात्रा मुळे...'

पुढील लेख
Show comments