Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तास्थापनेबाबत मोदींशी चर्चा झाली होती पण...'

Webdunia
गुरूवार, 30 डिसेंबर 2021 (11:35 IST)
महाराष्ट्रात 2019 मधील विधानसभा निवडणुकांनंतर समोर आलेल्या सत्तेच्या गणितामुळं अनेकांना धक्का बसला. विशेषतः सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजपलाही सत्तेपासून दूर राहावं लागलं. कारण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आघाडी करत सत्ता स्थापन केली.
 
पण, त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासंदर्भात दिल्लीत चर्चा झाली होती, मात्र मी स्वतः त्यांना त्यासाठी नकार दिला असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
 
आमची भूमिका वेगळी आहे, त्यामुळे तुम्हाला अंधारात ठेवायचं नाही, असं मी स्वतः मोदींना त्यांच्या कार्यालयात भेटून सांगितलं होतं, असंही पवारांनी स्पष्ट केलं.
 
तरीही नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा यावर विचार करावा असंही म्हटलं होतं. शिवसेनेशी फारकत घेतल्यानंतर भाजपला राष्ट्रवादीची गरज भासली असू शकते असंही पवारांनी म्हटलं आहे.
 
लोकसत्ता या वृत्तपत्राच्यावतीनं शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 'अष्टावधानी' या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी शरद पवार यांनी मुलाखती दरम्यान या घटनांचा उलगडा केला.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments