Marathi Biodata Maker

मग ठाकरे यांनी विठ्ठलाच्या चरणी कोरोना नष्ट होण्याचं साकड का घातलं?

Webdunia
सोमवार, 20 जुलै 2020 (08:05 IST)
अयोध्येतील बहुप्रतिक्षित असलेल्या राम मंदिराच्या निर्माणाचा मुहुर्त ठरला असून ५ ऑगस्टला राम मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. या मंदिराच्या भूमिपूजनासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार असल्याची चर्चा आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता पंतप्रधान मोदी यांना टोला लगावला. पवारांच्या विधानानंतर भाजप आक्रमक झाली असून प्रतिसवाल केला आहे. “…जर मंदिर बांधून कोरोना जाणार नसेल, तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठ्ठलाच्या चरणी कोरोना नष्ट होण्याचं साकड का घातलं?,” असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शरद पवार यांना केला आहे.
 
शरद पवार यांनी मोदी सरकारला सोलापूर येथील दौऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं होतं. “आम्हाला वाटतं की कोरोना थांबवला पाहिजे आणि काहींना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल,” असा टोला अप्रत्यक्षपणे पवारांनी मोदींना लगावला. यावर प्रत्युत्तर देताना दरेकर म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला पूर्ण भान आहे की, कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचं ते. देशातील कोरोनोचा प्रादुर्भाव संपविण्यासाठी सर्वाधिक उपाययोजना पंतप्रधान मोदी हे करत आहेत. हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही. मंदिर बांधून कोरोना जाणार नाही याचे निश्चित भान त्यांना आहे. परंतु आपल्या देवदेवतांचे आशीर्वाद आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. जर मंदिर बांधून आणि देवाची उपासना करुन कोरोना जाणार नसेल, तर राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाच्या चरणी महाराष्ट्रातील नव्हे, तर देशभरातील कोरोना जाऊ दे असं साकडं का घातलं? त्याचं उत्तर आपल्याकडे आहे काय?,” असा सवाल दरेकर यांनी पवारांना विचारला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

Goa fire जिल्हा प्रशासनाने उत्तर गोव्यात नाईटक्लब आणि हॉटेल्समध्ये फटाके वाजवण्यावर बंदी घालण्याचा आदेश जारी केला

नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधान कोण होणार? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी अखेर खुलासा केला

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून मणिपूरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर

LIVE: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! खात्यात ३००० रुपये येणार

ब्रह्मपुत्र नदीत पोहण्यासाठी गेलेल्या आठ जणांपैकी पाच जण बेपत्ता

पुढील लेख
Show comments