Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपचे 14-15 आमदार संपर्कात; जयंत पाटलांचा दावा

Webdunia
शुक्रवार, 6 मार्च 2020 (14:51 IST)
भाजपने मध्य प्रदेशात ऑपरेशन लोट्‌स सुरू केलेले असतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी अत्यंत महत्त्वाचा दावा केला आहे. राज्यातील भाजपचे 14 ते 15 आमदार महाराष्ट्र विकास आघाडीच्या संपर्कात आहेत, असा दावा करतानाच आम्ही मात्र राज्यात सत्तेत असताना भाजपने केलेला खोडसाळपणा करणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
 
मध्य प्रदेशातील ऑपरेशन लोट्‌सवरूनही पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजप सत्तेसाठी उतावीळ झालेली आहे, असा आरोप पाटील यांनी केला. भाजपचे 14 ते 15 आमदार आमच्या संपर्कात आहेत. आजही हे आमदार आमच्या संपर्कात आहेत. आमचे या आमदारांशी चांगले संबंध असून आम्ही त्यांची कामे करणार आहोत. आम्ही त्यांची मानसिकता समजू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
 
आमदार आमच्या संपर्कात असले तरी आम्ही त्यांना गळाला लावणार नाही. भाजपने ज्या चुका केल्या, त्या आम्हाला करायच्या नाहीत. सरकार चालावे यावर आमचा भर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या ऑक्टोबर महिन्याता झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला होता. मात्र, शिवसेना-भाजपमध्ये मानापमान नाट्य रंगल्यानंतर शिवसेनेने भाजपची साथ सोडली होती.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments