Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अतिवृष्टीग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींचे पॅकेज मंत्रिमंडळाचा निर्णय

अतिवृष्टीग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींचे पॅकेज मंत्रिमंडळाचा निर्णय
Webdunia
बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (08:02 IST)
गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती आल्या असून कोविडचे संकट असतानादेखील आपदग्रस्तांना राज्य सरकारने वाऱ्यावर न सोडता मदत केली आहे. यात ११ हजार ५०० कोटींच्या तरतुदीस मान्यता देऊन राज्य सरकार पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करीत आहे,असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नुकसान मोठे आहे.शेतकरी,व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार, सर्वसामान्य नागरिक, कारागीर सर्वांनाच झळ बसली आहे. त्यामुळेच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नेहमीच्या निकषापेक्षा वाढीव दराने मदत करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.
 
पूर, दरड समस्येवर कायमस्वरूपी उपाय करा; तज्ञ व प्रशासकांची समिती नेमून ३ महिन्यात अहवाल देण्याचे मुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळ बैठकीत निर्देश या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पूराचे संकट, दरडी कोसळण्याच्या घटना यावर तातडीने कारवाई कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. ते म्हणाले की, महाड व चिपळूण शहरातील पूर नियंत्रणासाठी तज्ञ समितीच्या अहवालानुसार वाशिष्टी, गांधारी, सावित्री नद्यातील वेट व गाळ काढून मॉडेल स्टडीच्या आधारे पूर संरक्षण भिंत ३ वर्षात पूर्ण करा.
 
कोकणातील बांधकामाधीन प्रकल्प (काळू,शाई,काळई.) येणाऱ्‍या ३ वर्षात पूर्ण करा
 
कोयना टेलरेस पाणी मुंबई लिंक प्रकल्पासाठीच्या डीपीआरवर अभ्यास करुन ३ महिन्यात निर्णय घ्यावा.डोंगर कोसळण्याच्या घटनेवर प्रतिबंधासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ व प्रशासकांची समिती नेमून ३ महिन्यात अहवाल तयार करा
 
कोकणाच्या २६ नदी खोऱ्‍यात पूर इशारा देणारी आरटीडीएस प्रणाली ३ महिन्यात स्थापित करा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

कुणाल कामराला दुसरे समन्स जारी, मुंबई पोलिसांनी त्याला या तारखेला हजर राहण्याचे आदेश दिले

Alert ! पश्चिम रेल्वेने मुंबईतील एसी लोकल गाड्यांबाबत मोठी अपडेट, तारखा आणि मार्ग तपासा

मुंबईत ५ एप्रिलपासून क्लीन अप मार्शल सेवा बंद होणार

या देशातील लोकही पीएम किसान सन्मान निधीचा फायदा घेत आहेत, १८१ 'मुस्लिम' लाभार्थ्यांविरुद्ध एफआयआर दाखल

मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या १७ बांगलादेशींना अटक, पोलिस तपासात गुंतले

पुढील लेख
Show comments