Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मागच्या दारानं केंद्रीय यंत्रणा आणल्या जातायेत - संजय राऊत

Webdunia
सोमवार, 28 जून 2021 (16:01 IST)
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील ईडीच्या कारवाईवरून संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला.
 
संजय राऊत म्हणाले, "राज्यातील तपास यंत्रणा सक्षम असताना केंद्रीय यंत्रणा मागच्या दाराने आणल्या जात आहेत. केंद्रीय यंत्रणा कुणाच्या तरी दबावाखाली काम करत असतील, तर हे संघराज्य व्यवस्थेला हानिकारक आहे."
 
"शरद पवार म्हणतात ते बरोबर आहे की, सत्ता गेल्यामुळे निराशा आणि वैफल्यातून अशा चौकशांचा ससेमिरा मागे लावला जात आहे," असंही राऊत म्हणाले.
 
यावेळी संजय राऊतांनी प्रताप सरनाईकांच्या पत्राबाबतही भाष्य केलं.
 
"प्रताप सरनाईक यांच्या पत्रात विनाकारण त्रास दिला जात असल्याचा उल्लेख आहे, हे मी वारंवार सांगतोय. या तक्रारींचा राज्याचे पोलीस, तपास यंत्रणा निष्पक्षपणे तपास करू शकतात. न्यायालयं आहेत. पण मागच्या दाराने केंद्रीय तपास यंत्रणा आणल्या जात आहेत," असं राऊत म्हणाले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments