Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय : इर्शाळवाडीमधील मुलांच्या आयुष्यातील अंधार दूर होणार ; शिंदे फाउंडेशन उचलणार खर्च

Webdunia
शनिवार, 22 जुलै 2023 (21:01 IST)
Chief Ministers big decision इर्शाळवाडी दुर्घटनेत आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप १०० जण बेपत्ता आहेत. आज सकाळ पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे एनडीआरएफच्या पथकाने बचावकार्य थांबवले आहे. दरम्यान, या घटनेत अनाथ झालेल्या २२ मुलांच्या मदतीसाठी श्रीकांत शिंदे फाऊंडेशन पुढे आले आहे. या घटनेत अनाथ झालेल्या मुलांचे पालकत्व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या फाऊंडेशनच्या माध्यमातून स्वीकारले आहे.
 
मुख्यमंत्री शिंदे यांनी या बाबत ट्विट करत माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये शिंदे यांनी लिहिले आहे की, ज्या इर्शाळगडाच्या कडेकपारीच्या अंगाखांद्यावर येथील मंडळी खेळली, तोच निसर्ग काळ होऊन आला. काही कळायच्या आत दरड कोसळली आणि होत्याचे नव्हते झाले. रात्री झोपेत असलेल्या अनेकांचे जीव गेले. काही अद्याप बेपत्ता आहेत.
 
शिक्षणासाठी आश्रमशाळा किंवा अन्यत्र असलेल्या मुलांनी आपले आई-वडील गमावले. दोन वर्षांपासून १४-१५ वर्षांपर्यंतची मुले अनाथ झाली. या मुलांच्या वाट्याला आलेल्या वेदना, दुःख सांत्वनापल्याड आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर अंधार आहे. त्यांच्या आयुष्यात या कठीण आणि परीक्षेच्या काळात पाठीशी ठाम उभे राहण्याची गरज आहे. समाज म्हणून या मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांना मायेच्या पंखाखाली घेणे, विश्वासाची ऊब देणे ही आपली जबाबदारी आहे.
 
हीच बाब लक्षात घेऊन इर्शाळवाडीतील सर्व अनाथ मुलांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवण्याचे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने ठरवले आहे. काळाने येथील मुलांवर मोठा आघात केला असला तरी त्यांचे आयुष्य सावरून जगण्याचे बळ देण्याचा निश्चय करण्यात आला आहे. या मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणाची जबाबदारी फाउंडेशनकडून घेण्यात येत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुंबईतील रस्त्यांवर पथारी व्यावसायिकांचा ताबा, मुंबई उच्च न्यायालयाने BMC ला फटकारले

मतदानपूर्वी बोलले ब्रिटिश पीएम ऋषि सुनक, म्हणाले-असे काहीही करू नका ज्यामुळे पश्चाताप होईल

विधानभवनात खळबळ उडाली, मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यासाठी आलेल्या महिलेने हाताची नस कापली

शिंदे गटाकडून कृपाल तुमाने यांना तर भाजपकडून परिणय फुके यांना विधान परिषदेचे तिकीट

...नाहीतर मराठा नेत्यांना परिणाम भोगावे लागतील, मनोज जरांगेंचा इशारा

सर्व पहा

नवीन

पोर्शे कार अपघातात सहभागी असलेल्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्व शरद पवारांनी राहुल गांधींची घेतली भेट

शरद पवारांकडून राहुल गांधींना पंढरपूर वारीला येण्याचे निमंत्रण

हाथरस घटनेबद्दल खासदार प्रियंका चतुर्वेदींचा मोठा जबाब, 'सत्संग करण्याऱ्या बाबांवर देखील...'

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : पात्रतेच्या अटी बदलल्या, अर्जाची तारीखही वाढवली, जाणून घ्या नवे बदल

पुढील लेख
Show comments