Dharma Sangrah

नाशिकमध्ये दोन गटात हाणामारी आणि दगडफेक, 6 पोलीस जखमी

Webdunia
शनिवार, 17 ऑगस्ट 2024 (12:52 IST)
बांग्लादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात हिंदू संघटनेने बंद पुकारले होते. या बंद दरम्यान उत्तर महाराष्ट्रात जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत दोन गटात हाणामारी आणि दगडफेक झाली .परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केले असता त्यात 6 पोलीसकर्मी जखमी झाले. 

नाशिक येथे बांग्लादेशात हिंदूंवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाने बंद पुकारला होता. या दरम्यान दोन गटात जोरदार हाणामारी झाली. भद्रकाली परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. 
पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधारांच्या नळकांड्या सोडल्या. आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. शांतता राखण्यासाठी एसआरपीएफच्या जवानांना आणि पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात केले आहे. शांतता राखण्यासाठी अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 
 
बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाने काढलेल्या मिरवणुकीत जळगाव शहरात ही घटना आज सकाळी घडली,"असे एका अधिकाऱ्याने सांगितले. काही अज्ञातांनी दुचाकीच्या शोरूमवर काही दगडफेक केली.'' या घटनेत शोरूमच्या काचा फुटल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस अधिकारी म्हणाले, "सकाळ हिंदू समाजाच्या शेकडो समर्थकांनी निषेध मिरवणुकीत भाग घेतला आणि नंतर आंदोलकांनी जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांच्या मागण्यांचे निवेदन सादर केले, परंतु या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला." स्थानिक पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
Edited by - Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे 1.06 कोटी रुपयांची फसवणूक

LIVE: पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

इंडिगो संकटावर भारतीय रेल्वेची मोठी घोषणा, अडकलेल्या प्रवाशांसाठी 84 विशेष गाड्या चालवणार

नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रभावित मार्गांसाठी कमाल भाडे मर्यादा निश्चित केली

पुढील लेख
Show comments