Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पारा घसरल्याने उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी भरली

Webdunia
बुधवार, 24 जानेवारी 2024 (09:54 IST)
उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम असून उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. रात्रीच्या तापमानात प्रचंड घसरण झाल्याने जळगावकरांना हुडहुडी भरली आहे. २२ जानेवारी रोजी जळगावात किमान तापमानाचा पारा ९ अंशावर तर कमाल तापमानाचा पारा २९ अंश सेल्सिअस होता. तर आज मंगळवारी रात्री तापमानाचा पारा ८ अंशावर जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
 
सध्या अंशतः ढगाळ हवामानामुळे राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. पारा घसरल्याने उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी भरली आहे. यात धुळ्याचा पारा यंदाच्या हंगामातील नीचांकी पातळीवर पोहोचली असून ६.३ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. आतापर्यंतच्या तापमानातील सर्वात नीचांकी तापमानाची म्हणून नोंद करण्यात आली आहे.
 
जळगावात मागील काही दिवसापासून किमान तापमानाचा पारा १० अंशावर होता. रात्री आणि पहाटच्या वेळी थंडीचा जाणवत होती. मात्र सोमवारी ९ अंशावर आल्याने हुडहुडी भरवणारी थंडी जाणवत होती. आज रात्री पारा ८ अंशावर जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तसेच दिवसाचे तापमान ३० अंशावर असणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.
 
२८ जानेवारीपर्यंत हा पारा ३० ते ३१ अंशावर असणार आहे. सध्या पहाटच्या वेळेस जळगाव शहरात सर्वत्र धुक्याची चादर बघायला मिळाली. त्यामुळे मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांच्या संख्येमध्ये देखील घट होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. दरम्यान, सध्या थंडीचा रब्बी हंगामातील पिकांना या मोठा फायदा होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

नवरात्रीच्या उपवासात काय खावे आणि काय खाऊ नये? योग्य नियम जाणून घ्या

शारदीय नवरात्री 2024 : नऊ देवींची नऊ रूपे जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

तुम्हाला पुन्हा पुन्हा कॉफी पिण्याचे व्यसन लागले आहे का? या 10 मार्गांनी ही सवय सुधारा

सावळी त्वचा असल्यास अशी घ्यावी काळजी, त्वचा होईल चमकदार

सर्व पहा

नवीन

प्रसिद्ध वकील माजीद मेमन यांचा टीएमसी सोडून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश

काय सांगता, महिलेच्या पोटातून बाहेर काढला दोन किलो केसांचा गुच्छ

भरधाव वेगवान कार झाडाला धडकली, 4 जणांचा अपघाती मृत्यू

नसरुल्लाला गुप्त ठिकाणी दफन करण्यात आले, मोठा हल्ला होण्याची भीती

जागावाटपाचा निर्णय लवकर घेण्याचे शरद पवारांचे माविआला आवाहन

पुढील लेख
Show comments