rashifal-2026

खेड रेल्वेस्थानकात चाकरमान्यांचा गोंधळ

Webdunia
गुरूवार, 8 सप्टेंबर 2022 (08:44 IST)
खेड:-परतीला निघालेल्या चाकरमान्यांमुळे कोकण मार्गावरून धावणाऱया नियमित गाडय़ांसह गणपती स्पेशल गाडय़ा तिसऱया दिवशीही विक्रमी गर्दीने अन् विलंबाने धावल्या. मुंबईच्या दिशेने जाणाऱया रत्नागिरी-दिवा पॅसेंजरमध्ये येथील स्थानकात तिष्ठत बसलेल्या प्रवाशांना प्रवेशच न मिळाल्याने गोंधळ घातला. राज्य राखीव दलाच्या पोलिसांसह स्थानिक पोलिसांनी चाकरमान्यांची समजूत घातली. स्थानकात खोळंबलेल्या चाकरमान्यांना जामनगर व मंगला एक्स्प्रेस या जलद गाडय़ांमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आल्याने चाकरमानी शांत झाले.
 
गणरायाला निरोप दिल्यानंतर चाकरमानी परतीला निघाले आहेत. कोकण, मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी 300 हून अधिक फेऱया सोडून चाकरमान्यांच्या मार्गातील अडथळे दूर केले असले तरी सर्वच रेल्वेगाडय़ा गर्दीने धावल्या. परतीच्या प्रवासातही हिच परिस्थिती कायम असून येथील स्थानकात दाखल होणाऱया रेल्वेगाडय़ांमध्ये प्रवेश मिळवताना गणेशभक्तांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. स्थानकात दाखल होणाऱया रेल्वेगाडय़ा आधीच हाऊसफुल्ल होवून येत असल्याने येथील स्थानकात आल्यावर गाडय़ांचे दरवाजेच उघडले जात नसल्याने प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक होत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

नोटांच्या बंडलासोबतचा VIDEO व्हायरल

लपाछपी खेळताना बेपत्ता झालेला मुलगा पाच दिवसांनी पाण्याच्या टाकीत मृतावस्थेत आढळला

वंदे मातरमच्या 150 वर्षांवर लोकसभेत चर्चा

LIVE: मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे विधान; "मी कोणताही पक्ष चालवत नाही,"

IND vs SA: गिल मैदानात परतण्यास सज्ज तर हार्दिक सरावापासून दूर

पुढील लेख
Show comments