Festival Posters

कॉंग्रेसचा आक्षेप बेगडी असून ते लबाडी करत आहेत : फडणवीस

Webdunia
सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (17:56 IST)
शेतकरी विधेयकावर कॉंग्रेसचा आक्षेप बेगडी असून ते लबाडी करत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. शेतकरी विधेयकावरुन कॉंग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी काल गदारोळ घातला. देशाच्या संसदेत असं वर्तन कधी पाहील नव्हतं. कॉंग्रेस आणि त्यांचे सहयोगी पक्ष खालच्या स्तरावर जाऊन काम करतायत. कॉंग्रेसला शेतकऱ्यांविषयी अजिबात प्रेम नाही. ते केवळ राजकारण करतायत असेही ते म्हणाले.
 
हमीभाव सरकार देणारच आहे असे पंतप्रधानांनी स्पष्ट केलंय. जो कायदा तयार केलाय त्यात कंत्राटी पद्धतीने माल विकता येईल. खासगी क्षेत्रातील लोक शेतकऱ्याशी करार करुन माल विकत घेतील. लहान शेतकऱ्याला वाहतूक परवडत नाही, तो तंत्रज्ञान वापरत नाही. पण यामुळे साखळी तयार होईल. शेतकऱ्याने तयार केलेल्या मालावर त्याला ८ टक्के द्यावे लागत होते पण आता तस होणार नसल्याचे ते म्हणाले.
 
संसदेने दोन बील पास केले ते पूर्णपणे शेतकरी हिताचे आहेत. यामुळे लहान शेतकऱ्यांना फायदा होईल. कोल्ड स्टोरेजमधून थेट माल विकता येत नव्हता. बाजार समितीत शेतकऱ्यांना कर द्यावा लागायचा. माल कुठे विकला जावा, किती किंमत असावी ? यावर शेतकऱ्यांचे नियंत्रण नव्हते. सिंगल मार्केट झाल्याने देशाच्या कोणत्या कोपऱ्यात माल विकायचा आणि किती किंमतीत विकायचा हे शेतकरी ठरवतील. त्यामुळे ही दोन्ही बीलं क्रांतीकारी असल्याचे फडणवीस म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

व्हिएतनाममध्ये आपत्ती, पूर आणि भूस्खलनात41 जणांचा मृत्यू

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर कंटेनर डिव्हायडरला धडकला; भीषण आगीत चालकाचा जळून मृत्यू

LIVE: समाजवादी पक्षाने बीएमसी निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली

"आमदार आणि खासदारांशी सौजन्याने वागा..." सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना सरकारचे निर्देश

पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेला रवाना; G20 शिखर परिषदेत भारताचे नेतृत्व करतील

पुढील लेख
Show comments