Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दररोज दीड ते दोन लाख नागरिकांची कोरोना चाचणी, टोपे यांची माहिती

Webdunia
बुधवार, 22 डिसेंबर 2021 (15:55 IST)
ओमायक्रॉन विषाणूमुळे जगात चिंता वाढली असून भारतातही दिवसेंदिवस ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर ओमायक्रॉन विषाणूचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. त्यामुळे ओमायक्रॉनचा पादुर्भाव वाढू नये यासाटी राज्य सरकारकडून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
 
राज्यात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ओमायक्रॉन रुग्ण संसर्गजन्य असला तरीही तो धोकादायक नसल्याचे टोपे यांनी सांगितले आहे. राज्यात ओमायक्रॉन विषाणूचे ५४ रुग्ण असून राज्यात दररोच दीड ते दोन लाख नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. तसेच येत्या १५ ते २० दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के लसीकरण होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालनामध्ये पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
महाराष्ट्रात ओमायक्रॉन विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. मराष्ट्रात ओमायक्रॉनच्या ५४ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील ५४ ओमायक्रॉनच्या रुग्णांपैकी सर्वाधिक २२ रुग्ण मुंबईत आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments