Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोनाबाबत खबरदारी घेतली जात नाही, कठोर निर्णय घ्यावे लागतील : अजित पवार

Webdunia
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (21:00 IST)
राज्यात कोरोनाबाबत खबरदारी घेतली जात नाही आहे. त्यामुळे कठोर निर्णय घ्यावे लागतील असं अजित पवार यांनी सांगितलं. कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेय. आठवड्यात दुपटीनं रुग्णवाढ होत आहे. कोरोनाबात खबरदारी घेतली जात नाही आहे. मास्क वापरलं जात नाही. याची जबरदस्त किंमत मोजावी लागेल असा इशारा अजित पवार यांनी दिला. कोरोनाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं देखील अजित पवार यांनी सांगितलं. यावेळी शिवजयंतीवरुन राजकारण करु नका, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.
 
शिवजयंती मर्यादित लोकांमध्ये साजरी करा. एका ठिकाणी १०० व्यक्ती असाव्यात असं देखील सरकारने सांगितलं, असं अजित पवार म्हणाले. शिवजयंतीच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना अनेकांनी शिवजयंतीवर बंधनं का आणता? असा प्रश्न उपस्थित केला. यावर प्रतिक्रिया देताना कोरोनाचं सावट आल्यावर आपल्या नागरिकांचा जीव वाचवणं, कोरोनाचा फैलाव होऊ नये हे देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळेच आपण याआधी महान व्यक्तींच्या जयंत्या, सण साधेपणाने साजरे केले. त्यामुळे कृपा करुन शिवजयंतीवरुन राजकारण करु नये, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments