Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आईने क्रूरतेची सीमा ओलांडली, 6 वर्षाच्या मुलावर कुऱ्हाडीने वार करुन देहाचे दोन तुकडे केले

Webdunia
बुधवार, 28 फेब्रुवारी 2024 (11:53 IST)
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ज्यामुळे आई आणि मुलाचे नाते कलंकित झाले आहे. एका आईने क्रूरतेची परिसीमा ओलांडत आपल्या सहा वर्षाच्या मुलाची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. यामुळे निष्पाप बालकाच्या मृतदेहाचे दोन तुकडे झाले.
 
मिळालेल्या माहितीनुसार आपल्या अल्पवयीन मुलाची हत्या केल्यानंतर महिलेने स्वतः विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कव्हे गावात ही घटना घडली. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
 
मृत मुलाचे नाव प्रणव गणेश चोपडे असून आरोपी आईचे नाव कौशल्या उर्फ ​​कोमल असल्याचे सांगण्यात येत आहे. मुलाचे दोन तुकडे केल्यानंतर आई कौशल्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र आईला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यामुळे महिलेचे प्राण वाचले.
 
याप्रकरणी मृत मुलाचे आजोबा नारायण चोपडे (वय 57) यांनी कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कौशल्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाचे आजी-आजोबा नातेवाईकाच्या लग्नाला गेले होते. दुपारी 12.30 च्या सुमारास त्यांची सून कौशल्याने त्यांना फोन करून मुलगा प्रणवचा खून केल्याचे सांगितले. यानंतर दादा नारायण यांनी ताबडतोब कौशल्याचा भाऊ आणि त्याचा मुलगा गणेश (कौशल्येचा नवरा) यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना ताबडतोब घरी जाण्यास सांगितले.
 
दरम्यान गणेशने घरी धाव घेतली असता घरातील भीषण दृश्य पाहून तो अवाक झाला. कौशल्याने कुऱ्हाडीने मुलाच्या शरीराचे दोन तुकडे केले होते.
 
महिलेने आपल्या मुलाला एवढा भयानक मृत्यू का दिला? याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र घरगुती वादातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी भीती व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर देहाचे रहस्य काय होते?

Ramayan रामायण काळातील 5 सर्वात शक्तिशाली महिला

18 सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण, या 5 राशींसाठी खूप धोकादायक !

जीवनसाथी तुमचा चांगला मित्र होण्यासाठी हे टीप्स अवलंबवा

उष्ट का खाऊ नये,हे आरोग्यासाठी हानिकारक का आहे ते जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

AIMIM मुंबईत 24 जागांवर उमेदवार उभे करणार

मुंबईत ईद-ए-मिलादची सुट्टी बदलली, 18 सप्टेंबरला Eid-e-Milad ची सार्वजनिक सुट्टी

जालना लाठीचार्जवेळी मनोज जरांगे पळून गेले होते, छगन भुजबळांनी केला मोठा दावा

निवडणुकीच्या रणनीतीवर विचारमंथन करण्यासाठी भाजप अध्यक्ष नड्डा यांनी मुंबई गाठली, लालबागच्या राजाला भेट दिली

देवेंद्र फडणवीस म्हणाले एकनाथ खडसेंच्या पुनरागमनाचा निर्णय गणेशोत्सवानंतर घेतला जाईल

पुढील लेख
Show comments