Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यातील 608 ग्रामपंचायत निवडणुकांच्या तारखा जाहीर, सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 सप्टेंबर 2022 रोजी मतदान होणार

Webdunia
शुक्रवार, 12 ऑगस्ट 2022 (19:04 IST)
पावसाचे  प्रमाण कमी असलेल्या विविध 51तालुक्यांतील 608 ग्रामपंचायतीच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 सप्टेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. या मध्ये नाशिक जिल्ह्यातील कळवण मधील 22 , दिंडोरीतील  50 आणि नाशिक तालुक्यातील 17 ग्राम पंचायतीचा समावेश करण्यात आला आहे.  17 सप्टेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज केली.
 
राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या १७ मे2022 रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले 51 तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
 
त्याचबरोबर निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्याबाबत राज्य विवडणूक आयोगास तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. 
 
घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदार18 ऑगस्ट2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे 24 ऑगस्ट 2022 ते 1 सप्टेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुट्टीमुळे 27, 28 व 31 ऑगस्ट 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत.
 
नामनिर्देशनपत्रांची छाननी 2 सप्टेंबर 2022रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 6 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. मतदान 18 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 19 सप्टेंबर 2022 रोजी होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत, अशीही माहिती मदान यांनी दिली.
 
जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या -
नंदुरबार: शहादा- 74 व नंदुरबार- 75.
धुळे: शिरपूर- 33. जळगाव: चोपडा- 11 व यावल- 2.
बुलढाणा: जळगाव (जामोद)- 1, संग्रामपूर- 1, नांदुरा- 1, चिखली-3 व लोणार- 2.
अकोला: अकोट- 7 व बाळापूर-1. वाशीम: कारंजा- 4.
अमरावती: धारणी-1, तिवसा-4, अमरावती-1 व चांदुर रेल्वे- 1.
यवतमाळ: बाभुळगाव- 02, कळंब- 02, यवतमाळ- 03, महागाव- 01, आर्णी- 04, घाटंजी- 06, केळापूर- 25, राळेगाव- 11, मोरगाव- 11 व झरी जामणी- 8. नांदेड: माहूर- 24, किनवट- 47, अर्धापूर-1, मुदखेड- 3, नायगाव (खैरगाव)- 4, लोहा- 5, कंधार-4, मुखेड- 5 व देगलूर- 1
हिंगोली: (औंढा नागनाथ)- 6.
परभणी: जिंतूर- 1 व पालम- 4. नाशिक: कळवण-22, दिंडोरी- 50 व नाशिक- 17.
पुणे: जुन्नर-38, आंबेगाव- 18, खेड- 5 व भोर- 2.
अहमदनगर: अकोले- 45.
लातूर: अहमदपूर- 1.
सातारा: वाई- 1 व सातारा-8. व
कोल्हापूर: कागल- 1.
एकूण: 608 
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments